मुंबई, दि. १७ : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलनं (Google Gemini AI) भारतीय कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक आश्चर्यकारक ऑफर आणली आहे. आता पात्र विद्यार्थींना गुगल AI प्रो प्लॅनचं एक वर्षाचं सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे, ज्याची नियमित किंमत सुमारे 19,500 रुपये आहे. ही ऑफर विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि करिअरला नवी दिशा देणारी ठरणार आहे. या ऑफरचं वैशिष्ट्य […]Read More
मुंबई, दि. १७ :– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा […]Read More
मुंबई दि १७– मुंबईतील फोर्ट भागात असणाऱ्या गॉथीक शैलीतील हेरिटेज बांधकामांचे सौंदर्य बिघडविणाऱ्या आणि पदपथावर बांधण्यात येत असलेल्या दिड कोटी रुपयांच्या आधुनिक शौचालयांच्या कामाला स्थगिती देण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली, तर याप्रकरणी तीस दिवसांत चौकशी करून त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्यात यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. […]Read More
महाड दि १७ ( मिलिंद माने)– सावित्री नदीच्या पात्रात पोलादपूर पासून महाड औद्योगिक वसाहती मधील रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे सावित्री नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली असतानाच त्यामध्ये भंगार विक्रेत्यांनी देखील आता भर घातली आहे. भंगार विक्रेते ग्रामीण भागातून मिळणाऱ्या तांब्याच्या वायर सावित्री नदीपात्रात शेडाव नाक्याजवळ जाळण्याचा उद्योग करून नदीपात्रात प्रदूषणाला हातभार घालत असल्याचे सिद्ध होत आहेत. […]Read More
मुंबई दि १७ — मुंबईला जगाशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मुंबईचे सकल उत्पन्न आगामी काळात दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र विकासाकडे डोळे मिटून पाहिले तर अंधारच दिसेल त्यामुळे विरोधकांनी आपल्या डोळ्यावरील धूळ साफ करावी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, आत्मपरीक्षण करायला हवं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं. नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या […]Read More
मुंबई दि १७ — विधानसभेत केवळ औपचारिकता पार पाडण्यात येतात का , हे केवळ माहिती देण्याचे नाही तर चर्चेचे सभागृह आहे, कामकाज किती आणि कसे करायचे याची काही पद्धत आहे का असे सवाल आज मंत्री आणि सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित करत विधानसभा कामकाजाचे वाभाडे काढून सरकारला घरचा आहेर दिला. विधानसभेचे विशेष सत्र आज सकाळी साडे नऊ […]Read More
मुंबई दि १७– पुढील दोन महिन्यात नवी मुंबईत सिडकोच्या ताब्यातील पाणी पुरवठा योजना स्वयंचलित तंत्रज्ञान पद्धतीवर नेण्यासाठी निविदा काढण्यात याव्यात अशी सूचना सिडको प्रशासनाला करण्यात येतील अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली.याप्रकरणी असंख्य वेळा मागणी करूनही कारवाई केली जात नाही आता राजीनामे देतो अशी संतप्त भावना प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करताना […]Read More
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र सरकारने आता ‘कोड पिंक’ (Code Pink in Maharashtra) या जागतिक मान्यताप्राप्त रुग्णालय आपत्कालीन प्रोटोकॉलला अधिकृतपणे अंमलात आणले आहे. हा उपक्रम राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये नवजात आणि लहान मुलांच्या अपहरणाला प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आला आहे. गर्दीच्या रुग्णालयांमध्ये बाळ चोरीच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, सर्वात असुरक्षित रुग्णांसाठी मजबूत सुरक्षा […]Read More
पटना, दि. १६ : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेचा (Special Intensive Revision – SIR) अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे. २४ जून २०२५ रोजी एकूण मतदारांची संख्या ७,८९,६९,८४४ होती. त्यापैकी ६,९९,९२,९२६ मतदारांनी आपले Enumeration Form सादर केले असून हे ८८.६५% इतके आहे. यापैकी ६,४७,२४,३०० फॉर्म्स ECINet वर अपलोड […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 24 हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या, विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धन-धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती, केंद्रीय प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तत्पूर्वी, यंदाच्या […]Read More