Month: July 2023

ट्रेण्डिंग

सत्यपाल मलिकांचे भाजपवर गंभीर आरोप

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “२०२४ मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक राममंदिरावर हल्ला घडवून आणू शकतात किंवा भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याची हत्या घडवून आणू शकतात. जे लोक पुलवामा हल्ला घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात. या लोकांना कशाचीही परवा नाही. ते चुकीच्या मार्गाने चालले आहे.” असे म्हणत भाजपवर गंभीर आरोप करणारा […]Read More

ट्रेण्डिंग

CBI चौकशीला विरोध करत मणिपूर अत्याचार पिडिता सर्वोच्च न्यायालयात

इंफाळ, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मे महिन्यात मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांची घृणास्पद घटना आता उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटत आहेत. उशीराने जागे झालेले सरकार आता आरोपींवर सीबीआय चौकशीची कारवाईची सारवासारव करत आहे. मात्र आता या प्रकरणातील दोन पीडित महिलांना सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या महिलांनी या प्रकरणाचा तपास […]Read More

महानगर

अच्छे दिनाच्या नावाखाली भाजप करतेय धार्मिक ध्रुवीकरण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अच्छे दिन च्या नावाखाली भाजप ने कायम धार्मिक ध्रुवीकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे (hate-crimes) वाढले आहेत,असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.ते पुढे म्हणाले की, मृत्यू […]Read More

देश विदेश

AI च्या मदतीने ऑपरेशन, पॅरालाईज्ड रुग्ण झाला तंदुरुस्त

न्यूयॉर्क, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI चे फायदे-तोटे यावर जगभर चर्चेच्या फैरी झडत असताना योग्य पद्धतीने अवलंब केल्यास AI द्वारे मानवी आयुष्य सुकर होऊ शकते. याचे अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. Artificial Intelligence च्या मदतीने केलेल्या सर्जरीमुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.हा […]Read More

राजकीय

2112 कोटींच्या जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रालयाची मंजूरी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडे ‘मित्रा’मार्फत सादर केलेल्या जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. सुमारे 2112 कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आहे. यासाठी 1478 कोटी रुपये अर्थसहाय्य जागतिक बँक देणार असून, उर्वरित हिस्सा राज्य सरकार देणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मंजुरीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

क्रीडा

जागतिक पोलीस गेम्समध्ये महाराष्ट्र पोलीसांची सुवर्णपदकांची हॅट्रीक

विनिपेग-कॅनडा,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे झालेल्या ‘वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम’ स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांनी कुस्तीमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्राचा तीन वेळचा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता चाळीसगावच्या विजय चौधरी यांच्यासह मुंबईचा नरसिंग यादव आणि बीडचा राहुल आवारे हे भारतासाठी सुवर्णपदकाची हॅट्रिक करत यश संपादन केले […]Read More

करिअर

बनारस हिंदू विद्यापीठात भरती

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) ने नुकतीच भरती केलेल्या 307 पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइट bhu.ac.in वर जाऊन उमेदवार या मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत, 307 पदे भरली जातील त्यापैकी 85 रिक्त पदे प्राध्यापकांसाठी आहेत. तर सहयोगी प्राध्यापकांसाठी 133 आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या 89 जागा […]Read More

राजकीय

संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी

ठाणे, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा […]Read More

ऍग्रो

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी […]Read More

खान्देश

काळाराम मंदिरात झाडाच्या सालीपासून बनलेली वस्त्रे दान…

नाशिक, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक येथील काळाराम मंदिरात आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासींनी झाडाच्या साली पासून बनवलेली वस्त्रे अर्थात वल्कले दान करण्यात आली. अफ्रिकेच्या जंगलात आदीवासी लोक झाडाच्या सालींपासून वस्र बनवतात. बडोदा येथील दत्तात्रेय सप्रे महाराजांनी त्यांच्या आफ्रिकेतील स्नेहीना ही माहिती कळवली. त्यानुसार ही वस्त्रे नाशिकच्या काळाराम समंदिराच्या विश्वस्त मंडळाकडे एकादशी निमित्ताने दान करण्यात आली. Donation […]Read More