Month: February 2023

Breaking News

भारताच्या या सात मुख्य क्षेत्रांच्या उत्पादनात ७.८% ने वाढ

नवी दिल्ली, दि. २८( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या उद्योग क्षेत्राला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, भारतातील आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात जानेवारी 2023 मध्ये 7.8 टक्के वाढ झाली, तर जानेवारी 2022 मध्ये 4.0 टक्के वाढ झाली होती.The output of these seven key sectors of India grew by […]Read More

देश विदेश

मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन अखेर मंत्रिमंडळाच्या बाहेर

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांचे सहकारी सत्येंद्र जैन यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला असून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हा राजीनामा स्विकारला आहे. दरम्यान सिसोदिया यांनी अटकेपासून दिलाशासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांना दिलासा देण्यास नकार […]Read More

राजकीय

कर्नाटक सरकारच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा

मुंबई दि.28( एम एमसी न्यूज नेटवर्क) : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर ,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी आज बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुंबई च्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.गेल्या 66 वर्षापासून कर्नाटक सरकारच्या जुलमी अन्याय अत्याचाराविरुद्ध सीमा भागातील मराठी भाषिक लोकशाहीच्या मार्गाने लढत आहे. मराठी भाषिकांची महाराष्ट्रात विलीन होण्याची तळमळ […]Read More

महिला

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

मुंबई,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या गेल्या अनेक वर्षांच्या सुरू असलेल्या लढ्याला आज काही प्रमाणात यश आले आहे. राज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. आता अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर मानधन वाढवून देण्याबरोबरच अंगणवाडीसेविकांना मोबाईल फोन्सही दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी […]Read More

राजकीय

महाराष्ट्रातील २७ जून पूर्वीची राजकीय स्थिती बहाल करा

नवी दिल्ली,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणावर आजपासून पुन्हा घटनापीठासमोर सलग सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी आज झाली. संवैधानिक खंडपीठासमोर युक्तिवाद करताना उद्धव ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तत्कालीन संकटकाळात राज्यपालांनी केलेली कारवाई घटनात्मकदृष्ट्या समर्थनीय नाही, असा युक्तिवाद […]Read More

महानगर

चाळीस कोटी खर्चून दावोसला काय केलं सांगा

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोसला मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक आणायला खासगी विमानाने गेले होते त्यासाठी चाळीस कोटींहून अधिक खर्च आला पण प्रत्यक्षात राज्यातील कंपन्यांनीच गुंतवणूक केली, मग त्या कंपन्या परदेशी असल्याचं का दाखवलं, एव्हढा खर्च झाला त्याचा हिशेब द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते […]Read More

महानगर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात कांदा , हरभरा , सोयाबीन , कापूस, द्राक्ष याचे उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत , सरकारने तातडीने दखल घेतली पाहिजे, नाफेड ला कांदा खरेदी करायला सांगा अशी मागणी अजित पवार यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेऊन यावर चर्चा केली पाहिजे असा स्थगन प्रस्ताव त्यांनी मांडला. भाजपाच्या […]Read More

ऍग्रो

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत करण्याच्या मुद्यावर विधान परिषदेत गदारोळ

मुंबई दि २८– कांदा उत्पादकांना मदत करण्यास राज्य सरकार तयार असून कांद्याची खरेदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं. मात्र विरोधकांनी यावरून गदारोळ केला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्य सरकारने २०१७-१८ साली ज्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली तशीच […]Read More

राजकीय

राज्यातील शेतकऱ्यांना देणं असलेला निधी ३१ मार्चपूर्वी

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अवर्षण , अतिवृष्टी ग्रस्त , सततच्या पावसामुळे नुकसान झालेले आणि नियमित पीक कर्ज फेडणारे शेतकरी यांना देय असणारी उर्वरित मदतीची रक्कम येत्या ३१ मार्च पर्यंत त्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते […]Read More

राजकीय

वारीसे खून प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी मधील पत्रकार शशिकांत वारिसे खून प्रकरणी कोणताही राजकीय दबाव येऊ देणार नाही , पोलीस महासंचालकांना सूचना देऊ आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची विनंती केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर जाहीर केलं. अतुल भातखळकर यांनी ती उपस्थित केली होती. रत्नागिरी मध्ये ग्रीन रिफायनरी […]Read More