Month: May 2023

देश विदेश

PFI च्या फुलवारी शरीफ प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभर छापे

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या फुलवारी शरीफ प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कर्नाटक, केरळ आणि बिहारमधील 25 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहे. एनआयएच्या पथकाने कटिहारच्या हसनगंज पोलीस स्टेशन अंतर्गत मुझफ्फर टोला येथे सुमारे ३ तास कारवाई केली. यावेळी एनआयएच्या पथकाने […]Read More

राजकीय

कुस्तीपट्टूंना न्याय द्या, राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. २८ तारखेला सरकारने कुस्तीपट्टूंना धरपकड करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर काल कुस्तीपट्टू पदके गंगार्पण करण्यास निघाले होते. दरम्यान या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]Read More

खान्देश

अहमदनगर आता अहिल्यानगर

अहमदनगर , दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ते अहिल्यादेवी नगर करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, लवकरच त्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज चौंडी इथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व हिमालायएवढे होते, त्यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला दिल्याने […]Read More

मनोरंजन

OTT वरील चित्रपट आणि वेब सिरिजसाठी केंद्राकडून नवीन नियम लागू

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जागतीक तंबाखू विरोधी दिन आहे, या निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी नवीन नियमांची अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, OTT प्लॅटफॉर्मला कंटेंटमध्ये तंबाखूविरोधी चेतावणी संदेश प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अधिसूचनेत असे म्हटले आहे की जर ऑनलाइन कंटेंट […]Read More

राजकीय

मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया आता महिन्याभरात

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इमारत आणि भूखंडाची मालकी नसल्याने अनेक वर्षांपासून पुनर्विकासापासून वंचित राहिलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. स्वयंपुनर्विकासासाठी तयार असलेल्या गृहनिर्माण संस्थांना जमिनीची मालकी देण्यासाठीचा मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेन्स) प्रक्रिया अर्ज केल्यानंतर महिन्याभरात निर्णय घेणे संबंधित यंत्रणाना बंधनकारक असल्याचा शासन आदेश आज राज्य सरकारने जारी केला आहे.मुंबईतील […]Read More

Uncategorized

निळवंडे धरणाचे पाणी अखेर लाभक्षेत्रात पोहोचले

अहमदनगर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे निळवंडे धरणाचे पाणी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून पहिली चाचणी घेण्यात आली. उत्तर अहमदनगर जिल्हयातील 182 गावांना वरदान ठरणा-या निळवंडे धरणाच्या कालव्यांना आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यास […]Read More

Uncategorized

बाळू धानोरकर यांच्यावर अंत्यसंस्कार , बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना…

चंद्रपूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना हजारो कार्यकर्ते नेते व नागरिकांच्या उपस्थितीत अंतिम निरोप देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव वरोरा येथील मोक्षधाम येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या निवासस्थानाहून निघालेल्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोक्षधाम येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. मुकुल वासनिक, […]Read More

ट्रेण्डिंग

या तारखेपासून सुरु होणार मुंबई-गोवा ‘वंदे भारत’

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व सुख सुविधांनी अद्ययावत असल्यामुळेप्रवाशांना  सुखद आनंद देणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा सुसाट प्रवास आता हळूहळू देशभर विस्तारू लागला आहे. देशभरातील पर्यटकांचे आवडीचे डेस्टीनेशन असलेल्या गोवा या ठिकाणी जाण्यासाठी देखील ‘वंदे भारत’ एक्स्पप्रेस सुरू होत आहे. कोकणवासियांची वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा संपली आहे. कोकण रेल्वे मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेसच्या […]Read More

महानगर

सावित्रीबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, वेबसाईटवर कारवाईचे निर्देश

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. […]Read More

कोकण

शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर चांदीची दिमाखदार पालखी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यावर्षी दोन जून या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ३५० वे वर्ष असून ते दिमाखाने साजरे करण्यात येत आहे. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्यावतीने दुर्गराज रायगड ही संस्थाही तेथे गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा साजरी करीत आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी […]Read More