mmcnews mmcnews

सांस्कृतिक

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा

सोलापूर दि २३:- संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत नामदेव पायरीची विधिवत पूजा आणि महाआरती झाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल दर्शन देखील घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , संत नामदेव महाराज यांचे वंशज असणारा नामदास परिवार उपस्थित होता.प्रसंगी […]Read More

पर्यावरण

गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मुर्तींचे विसर्जन समुद्रात, शासनाची भूमिका

मुंबई, दि. २३– पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेशाच्या मुर्ती कृत्रिम तलावात तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मुर्ती या परंपरागत समुद्रात विसर्जन करण्यात येतील व पर्यावरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे प्रतिज्ञापत्र आज शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग खुला होणार आहे. पीओपीवरील बंदीमुळे लाखो मुर्तीकारांच्या […]Read More

विदर्भ

वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टी, शेतीचे नुकसान; शेतकरी मेटाकुटीस

वाशीम दि २३– जिल्ह्यात रिसोड, मालेगांव, मंगरूळपिर तालुक्यात काल दिवसभर व रात्री झालेल्या मुसळधार ते अती मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्याना पूर आला. या भागातील हजारो हेक्टर शेती पुराच्या विळख्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील काच आणि पैनगंगा आणि मालेगाव तालुक्यातील अडाण नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मागील […]Read More

विदर्भ

अकोल्यात पारस बॅरेजचे गेट उघडले , सतर्कतेचा इशारा

अकोला दि २३:– अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे दोन गेट 6100 क्यूसेक्सने उघडले आहेत. पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने मन नदीत पूर परिस्थिती निर्माण झाल्याने, ह्या बॅरेजचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल पारस येथे ढगफुटी सदृशय पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले होते. तर आता काल रात्री झालेल्या पावसामुळे बॅरेजचे गेट उघडण्यात […]Read More

विदर्भ

अकोल्यात अतिवृष्टी,१५० घरांचे अंशतः नुकसान

अकोला दि २३:– अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील बाळापूर, पारस, पातूर तालुक्यातील चान्नी आणि सस्ती या मंडळांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला, या भागात मध्यरात्रीपासून मुसळधार कोसळल्याने गावांमधील अनेक घरांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गत पंधरा दिवसांपासून दडी दिलेल्या पावसाने बाळापूर व पातूर तालुक्यात जोरदार हजेरी दिली. बाळापूर मंडळात रात्रीच्या दरम्यान १७७.३ मिमी, पारस मंडळात ८२ […]Read More

बिझनेस

Zomato ची दोन दिवसात 52 हजार कोटींची कमाई

मुंबई, दि. २२ : देशात सर्वात मोठी फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोची परेंट कंपनी इटरनल ( Eternal ) शेअर बाजारात गेल्या दोन दिवसापासून मोठी कमाई करत आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात कंपनी शेअरमध्ये २१ टक्के वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपमध्ये ५२ हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते […]Read More

ट्रेण्डिंग

होंडा लाँच करणार स्वस्त इलेक्ट्रिक बाईक

मुंबई, दि. २२ : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया भारतात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय पेटंट ऑफिस (IPO) मध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. यावरून असे दिसून येते की, कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकलवर काम करत आहे, जी शाईन १०० च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन बाईक बनवताना वेळ आणि पैसा […]Read More

देश विदेश

जगातील २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत मुंबई

मुंबई, दि. २२ : भारतातील प्रमुख शहर मुंबईने जून महिन्यात बेर्ले नॉटिंघम डिझाइन स्टुडीओतर्फे जगभरातील १२५ शहरांमधून निवडलेल्या २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत १७वा क्रमांक पटकावला आहे. निळे शहर म्हणून प्रसिद्ध जोधपूरने या यादीत ५वा क्रमांक मिळवला. इटलीमधील इंद्रधनुषी गाव बुरानो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत हवाना (क्युबा), इस्तंबूल (तुर्की), कोपेनहेगन (डेन्मार्क), रिओ […]Read More

आरोग्य

सरकारकडून ‘मोतीबिंदू मुक्त राज्य’ मोहिम सुरू

जालना,दि. २२ : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त टाळता येण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी राज्य सरकारने ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम सुरू केली आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज सांगितले. “सरकार संपूर्ण महाराष्ट्रात मोतीबिंदू मुक्त राज्य निर्माण करण्यासाठी आणि आरोग्य सेवा वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर […]Read More

महानगर

धमकी देऊन ५० हजार रु. उकळल्याबद्दल RTI कार्यकर्त्यांला अटक

ठाणे, दि. २२ : खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन हॉटेल व्यावसायिकाकडून ५० हजार रुपये उकळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील एका आरटीआय कार्यकर्त्याला अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने (एईसी) सोमवारी रात्री आरोपी नितीन गोळे (४९) याला अटक केली आणि स्थानिक न्यायालयाने त्याला २५ […]Read More