ठाणे दि २२ : एका सर्वसामान्य पोलीस कुटुंबावर आलेल्या अचानक वैद्यकीय संकटात मानवी सहवेदना आणि जबाबदार लोकप्रतिनिधींची तत्पर मदत यामुळे एक महत्त्वपूर्ण जीवन वाचवण्यात यश आले.ठाणेशहर पोलीस दलातील पोलीस शिपाई सौ मनिषा बारमाळे यांना अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले आणि उपचारांसाठी मोठ्या आर्थिक खर्चाची गरज होती. त्यांना मुलुंड येथील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, […]Read More
चंद्रपूर दि २२:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता आज पार पडली. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपदी रवींद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदी संजय डोंगरे बिनविरोध निवडून आले. काँग्रेसने आपल्या तलवारी म्यान केल्याने बँकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला.जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक यावेळी हायप्रोफाइल झाली होती. प्रथमच या निवडणुकीत […]Read More
मुंबई दि २२महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय.2006 ट्रेन बॉम्ब धमाकच्या आरोपीना निर्दोष मुक्त केल्याच्या हायकोर्टाच्या निर्णयच्या विरोधात सरकार सुप्रीम कोर्ट मध्ये दाद मागणार.Read More
मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई जिल्हा सहकारी बँक, मजूर फेडरेशन व विभागीय मजूर फेडरेशन यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख ७३ हजार २२२ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. दरेकरांकडून […]Read More
मुंबई दि २२– आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुरू केला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या वर्षीचा […]Read More
जालना दि २२:– जालन्याच्या परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. यामुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतीपिकं पाण्याखाली गेली असून शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. परतूर तालुक्यात काल सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांना पूर आला असून विहिरीही तुडूंब भरल्या आहेत. दरम्यान, […]Read More
बीड दि २२… बीड जिल्ह्यात मागील एका महिन्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं होतं . मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यासह अनेक भागात रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.पावसाची हजेरी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी जीवनदायी ठरलेला आहे, पाऊस झाल्यानंतर आता शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात मग्न झाला आहे. माजलगाव, पाटोदा, आष्टी, गेवराई, वडवणी, बीड, धारूर, […]Read More
बुलडाणा दि २२– बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, तूर, मका यासह खरिपाची पिके करपत चालली होती शेतकऱ्यांची चिंता वाढत होती मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव,शेगाव, संग्रामपुर, तालुक्यासह अनेक भागात रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली मात्र लोणार तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने गावे प्रभावित झाली आहेत. लोणार तालुक्यातील टिटवी ल. पा. देऊळगाव कुंडपाळ ल.पा. प्रकल्प गुंधा […]Read More
जालना दि २२:– जालन्यात शेतकऱ्यांची तिखट मिरची गोड झाल्याचं बघायला मिळतंय. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव जिल्ह्यातील मिरचीची बाजरपेठ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दररोज 250 ते 300 टन हिरव्या मिरचीची आवक होत असून सध्या मिरचीला बाजारभावही चांगला मिळत आहे. पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारातली मिरची परदेशातही निर्यात केली जात आहे. सध्या या मिरचीला 8 ते […]Read More
पटना, दि. २१ : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक महत्त्वाची घोषणा केली आहे – बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात माता सीता यांचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. हे मंदिर पुनौरा धाम येथे बांधले जाईल, जे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. मंदिराचा भूमिपूजन सोहळा 8 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. […]Read More