mmcnews mmcnews

राजकीय

पाच लाख विस्थापित सिंधी परिवारांना मिळणार मालमत्तापत्र

मुंबई, दि. ३० – राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. या परिवारांना मालमत्तापत्र देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील प्रत्येक शेतरस्त्याचे वाद मिटवून येत्या पाच वर्षात प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी […]Read More

राजकीय

“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज”

मुंबई, दि. ३० :– “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि जनतेने एकत्र येऊन जनजागृती करत, लोकचळवळ […]Read More

महानगर

पालिकेच्या वाढीव दंडात्मक कारवाईला विरोध

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी कंत्राटदारांकडून किती दंड आकारला – खा. संजय दिना पाटील मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा १५ हजार रुपये प्रत्येक खड्ड्यांसाठी दंडात्मक म्हणुन भरावे लागणार आहेत. याचा विरोध खासदार संजय दिना पाटील यांनी केला असून हा दंड अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुर्वी खड्डे करणा-या गणेशोत्सव मंडळांना २ हजार रुपये दंड […]Read More

राजकीय

प्रताप सरनाईक यांच्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाचे १२ कोटी रुपये

मुंबई :(३० जुलै) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यवसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे.येत्या १ ऑगस्ट पासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात (Discount rate) प्रति लिटर […]Read More

राजकीय

मंडपासाठी खड्डा खणल्यास आकारण्यात येणारा १५ हजारांचा दंड कमी करून

मुंबई, दि ३०: मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि ३० : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहरच्या वतीने  सिहंगड पायथा, डोणजे या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,  शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नैतृत्वाखाली हे कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दोन सत्रामध्ये होते, पहिल्या सत्रात पक्ष संघटन व पक्ष बांधणी या विषया वर  कार्यकर्त्यांनी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गरिबांची घर उध्वस्त होऊ देणार नाही-डॉ.हुलगेश चलवादी.

पुणे, दि 30 ‘गरिबी हटाओ’ची घोषणा देत गरिबांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या देशाच्या माजी प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांचा आदेशाचा संरक्षण खात्याला विसर पडला आहे.स्वातंत्र्यापूर्वीची ‘बर्माशेल’ आणि आताची ‘इंदिरानगर’ ही वस्ती खाली करण्याची नोटीस वायूदलाने पाठवली आहे.गोरगरिबांच्या हक्काचे घर हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे.परंतु, कुठल्याही परिस्थितीत झोपडपट्टी वासियांवर अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे […]Read More

ट्रेण्डिंग

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

नवी दिल्ली, दि. २९ : दिल्लीत एका ६ वर्षीय मुलीचा ‘रेबीज’मुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर, देशभरात गंभीर बनलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येची आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. ही परिस्थिती ‘अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी’ असल्याचे नमूद करत, न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी सुरू केली असून, या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

कोणत्याही जागतिक नेत्याची मध्यस्ती नाही, ऑपरेशन सिंदूर सुरूच…

नवी दिल्ली, दि. २९ : जगातील कोणत्याही देशाच्या प्रमुखाने ऑपरेशन सिंदूर प्रकरणी मध्यस्ती केली नाही असे निःसंदिग्धपणे स्पष्ट करत आत्मनिर्भर भारत या आमच्या भूमिकेमुळेच आज आपल्या सैन्यदलाने अत्युच्च पराक्रम दाखवत पाकिस्तानला गुढघ्यावर आणले आहे. हतबल झालेल्या पाकिस्तानने विनंती केल्यावरूनच ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले आहे. जोवर पाकिस्तान दहशतवादी कारवाया करत राहील तोवर ते सुरूच राहील […]Read More

मनोरंजन

‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदी रंगभूमीवर

मुंबई, दि. २९ : मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड असलेलं नाटक म्हणजे घाशीराम कोतवाल. विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून अजरामर झालेलं ‘घाशीराम कोतवाल’चं वादळ आता हिंदी रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालं आहेत. पण ते मराठीत नाही तर हिंदी रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. या नाटकाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज […]Read More