लातूर दि १:– शंखी गोगलगायीच्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात सध्या आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव झालाय. आफ्रिकन गोगलगायीमुळे त्यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. महादेव गोमारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यांच्या शेतात दिसून येत आहे यामुळे […]Read More
मुंबई, दि. १ :– कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र – कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास जीआय टॅग प्राप्त आहे. या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अॅण्ड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (LIDCOM) आणि डॉ. बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (LIDKAR) या दोन महामंडळाकडेच असल्याचे दोन्ही महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले […]Read More
ठाणे, दि १ शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना मंत्री संजय राठोड उपस्थित होते. लवकरच यवतमाळ […]Read More
*मुंबई दि १:– विविध राज्यांमध्ये देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या मांनधनावर काम करणाऱ्या तसेच गेल्या काही वर्षा पासून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या देशातील सुमारे १० लाख आशासेविकांसाठी देशात समान कायदा व समान वेतन देण्यात यावे, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत शून्य प्रहरा वेळी केली. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम […]Read More
भाईंदर दि १ : — परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय मागण्या चर्चेतून मार्गी लावणे आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती आम्हाला मान्य आहे. मात्र, मिरा – भाईंदरमधील सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकत, बेकायदेशीररित्या संप पुकारून राजकीय स्वार्थासाठी नागरिकांना वेठीस धरणे हे कदापिही सहन केले जाणार नाही. या पार्श्वभूमीवर, अशा अराजक निर्माण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात […]Read More
मुंबई दि १– महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली असून वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्याचा फटका बसला असून त्यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्य विकास आणि औकाफ हे खाते देण्यात आले आहे. कोकाटे यांचे कृषी खाते आता दत्तात्रय मामा भरणे यांच्या कडे सोपविण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात मोबाईलवर पत्त्त्यांचा […]Read More
मुंबई, दि. ३१ : राज्य सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आरक्षण उपसमितीने याबाबत केलेल्या शिफारशीनंतर ही बिंदूनामावली निश्चित करण्यात आली आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह […]Read More
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) तपासणी आणि पडताळणी (C&V) प्रक्रिया पूर्ण केली असून, यामधून पुन्हा एकदा सिद्ध झाले की EVMs छेडछाडविरहित आहेत. आयोगाच्या 17 जून 2025 रोजीच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राज्यातील 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये पार पडली. या तपासणीसाठी 10 उमेदवारांनी अर्ज केले होते, ज्यापैकी 8 उमेदवार […]Read More
मुंबई, दि. ३१ : कबुतरांना खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे. हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबईत कबुतरांना खाद्य न घालण्याबाबत कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य घालण्यात येत असेल आणि याबाबत पालिकेच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश […]Read More