mmcnews mmcnews

देश विदेश

उद्ध्वस्त झालेल्या नालंदा विद्यापीठाला नवी झळाळी, विश्वविद्यापीठ आजपासून सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी, १९ जून रोजी नवीन नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन केले. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठ पुन्हा सुर करण्याची संकल्पना मांडली होती. त्याला आज मुर्त रूप आले आहे. भारताच्या प्राचीन वारशाचे पुनरुज्जीवन करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. हे नवीन संकुल नालंदाच्या प्राचीन विद्यापीठाच्या अवशेषांजवळच आहे. एकेकाळी देश-परदेशातील विद्यार्थी याच विद्यापीठात […]Read More

राजकीय

नीटची परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याची आपची मागणी

मुंबई दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क) : आम आदमी पक्षाने आज मुंबईत हजारो कोटींच्या नीट घोटाळ्याचा निषेध केला.“मोदी सरकार 3.0 ची सुरुवात मतमोजणीच्या दिवशीच नीट घोटाळ्याने झाली. एखाद्याला वाटले होते की लोकप्रिय जनादेश आणि निवडणूक समर्थनाची व्यापक झीज यामुळे भाजपचा अहंकार आणि उद्धटपणा कमी झाला असता, परंतु नीट घोटाळा सिद्ध झाला आहे. भाजप फक्त अयोग्य आहे. […]Read More

राजकीय

महाभ्रष्ट भाजप सरकारविरोधात काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार , २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून […]Read More

आरोग्य

पाणीपुरीची चटक पडली महागात, 80 पेक्षा अधिकांना विषबाधा

जळगाव, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ८० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून काही बालकांची परिस्थीती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यात ३० जणांना अडावद येथील […]Read More

विदर्भ

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे वाशीम जिल्ह्यात उत्साहात आगमन

वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोतेच्या गजरात शेगावहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज वाशीम जिल्ह्यात आगमन झाले. हजारो भगव्या पताकाधारी वारकऱ्यांसह पांढऱ्या शुभ्र गणवेशात शिस्तीत ही पालखी १३ जूनला शेगावहून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पुढील चार दिवस श्रींच्या पालखीचा वाशीम जिल्ह्यातील डव्हा, शिरपूर, मसला पेन […]Read More

राजकीय

महाराष्ट्र भाजपाला देवेंद्रजींचेच नेतृत्व

नागपूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे. आज सकाळी नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे […]Read More

कोकण

पालघर मध्ये फुलली ऑर्किड फुलांची शेती

पालघर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण म्हटले की आपल्या समोर तिथली भुरळ घालणारी निसर्गसंपन्नता समोर येते. तिथला समुद्र किनारा,नारळ, सुपारी,आंबे यांच्या बागा . अशा कोकणात विविध शेतकरी शेतीमध्ये प्रयोग करत असतात. असाच वेगळा प्रयोग केला आहे. रामचंद्र सावे आणि त्यांच्या बंधुंनी . सावे यांच्याकडे स्वतःची फार कमी जमीन होती. भाजीपाल्याची ते शेती करत […]Read More

सांस्कृतिक

श्री अंबाबाई चरणी अर्पण सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी सुरु

कोल्हापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक कोल्हापुरात हजेरी लावतात. अनेक भाविक देवीला रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिनेही अर्पण करतात. श्री अंबाबाई चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी आजपासून सुरु झालीय. ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर, श्री जोतिबा चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचीही मोजणी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आयशर ट्रकची धडक, पाच महिला ठार

सोलापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे एका ट्रकने सात महिलांना धडक दिली. यामध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला आहे तर दोन महिला गंभीर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सांगोला तालुक्यातील चिकमहुद बंडगर वाडी परिसरात काम झाल्यानंतर काही महिला कामगार वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. प्रसंगी कोळसा वाहतूक करणाऱ्या […]Read More

पर्यटन

कलावंतीण दुर्ग

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहमनी सल्तनतने बांधलेला, प्रबळगड किल्ला पनवेल किल्ला आणि कल्याण किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरूज म्हणून वापरला गेला. हा किल्ला पूर्वी मुरंजन या नावाने ओळखला जात होता परंतु शिवाजीच्या राजवटीत त्याचे नाव देण्यात आले. पश्चिम घाटाच्या बाजूने, किल्ल्याची पायवाट घनदाट जंगलांनी व्यापलेली आहे, ज्यामुळे ट्रेक एक साहसी बनतो. प्रो […]Read More