उद्ध्वस्त झालेल्या नालंदा विद्यापीठाला नवी झळाळी, विश्वविद्यापीठ आजपासून सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी, १९ जून रोजी नवीन नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन केले. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठ पुन्हा सुर करण्याची संकल्पना मांडली होती. त्याला आज मुर्त रूप आले आहे. भारताच्या प्राचीन वारशाचे पुनरुज्जीवन करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. हे नवीन संकुल नालंदाच्या प्राचीन विद्यापीठाच्या अवशेषांजवळच आहे. एकेकाळी देश-परदेशातील विद्यार्थी याच विद्यापीठात शिकत होते. ते जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र तर होतेच शिवाय पहिले निवासी विद्यापीठ मानले जात होते. विद्यार्थी व शिक्षक एकाच संकुलात राहून संशोधन करायचे.
प्राचीन नालंदा विद्यापीठाविषयी
प्राचीन नालंदा विद्यापीठ बिहार राज्यातील राजगीरच्या उत्तरेस ११·२७ कि.मी. अंतरावर होते. इसवी सनाच्या पाचव्या शतकात या विद्यापीठाची स्थापना झाली. गुप्तवंशाच्या सहा राजांकडे या विद्यापीठाची स्थापना आणि संवर्धनाचे श्रेय जाते. या विद्यापीठात भारताबरोबरच जपान, कोरिया, चीन, तिबेट, इंडोनेशिया, पर्शिया, तुर्की आणि जगातील अनेक देशांतील विद्यार्थी सुमारे १०,००० विद्यार्थी शिक्षणासाठी तर २००० विद्वान अध्यापनासाठी होते. त्यांच्या ग्रंथालयात सुमारे ९० लाख पुस्तकांचा संग्रह होता. बौद्ध धर्माचे भिन्न संप्रदाय, जैन धर्म, ब्राह्मणी धर्म व इतर धर्म त्याचप्रमाणे योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, ज्योतिष, चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या इ. विषय इथे शिकवले जायचे.
बख्तियार खिलजीने भारतातून बौद्ध धर्म, ज्ञान आणि आयुर्वेदाची मुळे नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान तो आजारी असताना विद्यापीठातील वैज्ञांनी त्याला वाचवले होते. त्यानंतर त्याने नालंदाच्या विद्यापीठाला आग लावली. या आगीत सुमारे ९ दशलक्ष हस्तलिखित पुस्तके जळून राख झाली. ही आग नंतर ३ महिने धुमसत होती. खिलजीने नालंदाच्या हजारो धर्मपंडित, वैद्यशास्त्री आणि भिक्षूंनाही जाळून मारले.
विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न त्यानंतर केले गेले. भारतीय संसदेने २०१० साली, विद्यापीठाच्या पुनर्बांधणीसाठी नालंदा विद्यापीठ कायदा मंजूर केला. २०१४ साली नालंदा विद्यापीठाने जवळपास आठशे वर्षांनी कामकाज सुरू केले. आणि १९ जूनला नालंदा विद्यापीठाचे झाले. हे विद्यापीठ व्हावे यासाठी अनेक देशांनी संयुक्त प्रयत्न केले आहेत. त्यानुसार, भारताच्या बिहार राज्यात नुकतेच प्राचीन विद्यापीठ पुन्हा स्थापित करण्यात आले आहे.