mmcnews mmcnews

कोकण

राजकोट किल्ल्यावरील पायाभरणीला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात

सिंधुदुर्ग, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या पायाभरणीचा 19 फेब्रुवारी हा शिवजयंती दिनी शुभारंभ होणार आहे .हा पूर्णाकृती योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभारण्यात येत आहे. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवीन पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातील सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी, पोलिसांची कारवाई

पुणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील हडपसर भागातील मार्वल बाऊण्टी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सोसायटीतील सी-901 या 3 BHK फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज आणि रितू भारद्वाज या बहिणींनी 300 हून अधिक मांजरी पाळल्याची बाब समोर आली आहे. सदर सभासदाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी का पाळल्या? हे अद्याप स्पष्ट झाले […]Read More

बिझनेस

Reliance चे Jio-Coin डिजिटल चलन

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या सर्वत्र जिओ क्वाईनची चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओ क्वाईन ‘हॉट टॉपिक’ बनला आहे. काही तज्ज्ञांकडून एक टोकनची किंमत 0.50 डॉलर (जवळपास 43.30 रुपये) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिओ क्वाईन हे डिजिटल चलन आहे. इथरियम किंवा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीऐवजी रिलायन्स जिओचे हे नाणे […]Read More

अर्थ

अमेरिकेकडून भारताला मिळणारा १८२ कोटींचा निधी रद्द

वॉशिग्टन डीसी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांनी भारतातील निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा १८२ कोटी रुपयांचा निधी रद्द केला आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने (DOGE) शनिवारी हा निर्णय घेतला. DOGE ने X वर पोस्ट करून एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विभागाने रद्द केलेले […]Read More

देश विदेश

प्रयागराज रेल्वेस्थानक २६ फेब्रुवारीपर्यंत बंद

प्रयागराज, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पर्वणीला आता शेवटचे १० दिवस बाकी आहेत. १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या या महाकुंभाला दररोज लाखोंच्या संख्येने हजेरी लावत आहेत. प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. काही दिवसांपूर्वीच अमृतस्नानादरम्यान झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी झाल्याने ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी […]Read More

ट्रेण्डिंग

केंद्र सरकार सुरु करणार India AI कॉम्प्युट पोर्टल

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारने देशांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स तयार करण्यासाठी गतीमान धोरण निश्चित करत आहेत. सरकारकडून आता लवकरच इंडिया AI कॉम्प्युट पोर्टल सुरू करणार आहे. केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांसह प्रमुख भागधारकांना या प्लॅटफॉर्मद्वारे गणना क्षमता विनंती करण्याची परवानगी असेल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, इंडियाAI कॉम्प्युट पिलरने सर्व […]Read More

विदर्भ

वाशीम शहरात वानरांचा उच्छाद, सामानाचे मोठे नुकसान..

वाशिम दि १७:– वाशीम शहरात वानरांनी उच्छाद मांडला असून वानरांची अनेक टोळकी सध्या वाशीम शहरातील मुख्य चौकात धुमाकूळ घालत आहेत. अख्खं वानराच टोळकं घरात घुसून सामानाची नासधूस करत असून वानरांच्या धावपळीत अचानक रस्त्यावर दुचाकीसमोर आल्याने अपघात सुद्धा घडले आहेत. वानरांचा उच्छादाने डिश, सोलर पॅनलच नुकसान होत आहे. घरावरून थेट दुचाकी, चारचाकी गाड्यांवर उड्या मारल्याने यात […]Read More

पर्यटन

भुज – इतिहास, संस्कृती आणि कच्छच्या सौंदर्याची राजधानी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुजरातच्या कच्छ प्रदेशात वसलेले भुज हे शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गसौंदर्याचा उत्तम मिलाफ असलेले पर्यटनस्थळ आहे. भुजला भेट दिल्यास तुम्हाला राजवाडे, हस्तकला, स्वादिष्ट गुजराती पदार्थ आणि रणोत्सवाची जादू यांचा एकत्र अनुभव घेता येतो. भुजची ऐतिहासिक पार्श्वभूमी: भुजचे नाव राजा राव खेंगरजी I यांच्या काळात प्रसिद्ध झाले. १६ व्या शतकात […]Read More

ट्रेण्डिंग

वालावलकरांचो थोरलो जावई ! ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर कुणाल

‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर आणि संगीतकार कुणाल भगत हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिताच्या घरी लगीनघाई सुरू होती, यात साखरपुडा, मेहंदी, संगीत आणि हळद असे सर्व विधी पार पडले. त्यानंतर रविवारी अंकिता आणि कुणाल यांचा लग्नसोहळा कोकणात थाटामाटात पार पडला. या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.Read More

ट्रेण्डिंग

अमिताभ बच्चन यांचा जावई अडचणीत, निखिल नंदावर ‘हे’ आहेत आरोप

बीग बी अमिताभ बच्चन यांचा जावई निखील नंदा मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं येथे निखिल नंदा यांच्यासह नऊ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फार्मा ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरच्या आत्महत्येनंतर हे गंभीर प्रकरण समोर आलं आहे. निखिल नंदा आणि संबंधित 9 जण कंपनीचा सेल वाढवण्यासाठी सतत एजन्सी संचालकांना मानसिक त्रास […]Read More