mmcnews mmcnews

महानगर

राहुल गांधीकडून घडली घोडचूक! छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजलीऐवजी वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देताना मोठी चूक केली आहे. शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देताना राहुल गांधी यांनी छत्रपती […]Read More

ट्रेण्डिंग

तब्बल 18 हजार फुटावर साकारली महाराजांची हरित रांगोळी

अकोला दि १९:– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हयातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात चतुर्भुज आर्ट्सचे रांगोळी कलाकार अनिल काळे आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून तब्बल 18 हजार स्क्वेअर फुटावर गहू आणि मोहरीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य हरित रांगोळी साकारण्यात आली आहे .ड्रोन कॅमेऱ्यातून दिसणारी ही हरित रांगोळी तब्बल 18 […]Read More

ट्रेण्डिंग

शिवजयंती : छत्रपती पुतळ्यांमध्ये नाही, तर आचरणात हवे, शिवसंस्कार मनात

राधिका अघोर शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ।।१।। छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वावी जयंती आपण सगळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतभरात आणि जगातही अनेक ठिकाणी साजरी करतो आहोत. आणि पुढेही युगानुयुगे ही शिवजयंती साजरी करणारच आहोत. असा स्वयंभू, पराक्रमी, श्रीमंत योगी, राजा आपल्याला लाभला, हे खरोखरच आपलं भाग्य आहे. […]Read More

राजकीय

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पदांना मान्यता

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या ३४६ पदांना तसेच त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक […]Read More

महानगर

सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मान्यता

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा आयोग १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करेल. या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत असेल. […]Read More

Lifestyle

पारंपरिक अवधी गलौटी कबाब – नाजूक आणि चविष्ट लखनवी कबाब

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उत्तर भारतातील अवधी खाद्यसंस्कृती म्हणजे समृद्ध चवींचा खजिना. त्यातीलच एक खास पदार्थ म्हणजे गलौटी कबाब. हा कबाब लखनौच्या नवाबी खाद्यसंस्कृतीचा एक अनमोल वारसा आहे. गलौटी कबाब म्हणजे अतिशय नाजूक आणि तोंडात टाकताच विरघळणारा कबाब, जो खवय्यांच्या हृदयात खास स्थान मिळवून आहे. गलौटी कबाबचा इतिहास: या कबाबाच्या निर्मितीमागे एक अनोखी […]Read More

देश विदेश

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार, नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून 19 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. मात्र ज्ञानेश कुमार यांची ही […]Read More

अर्थ

सुरक्षित आर्थिक व्यवहारांसांठी Google Pay’चे AI फीचर्स

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Google Pay ने आपल्या युजर्ससाठी पेमेंट करताना वापरता येईल असे एआय फीचर्स सुरु केलं आहे. आता गुगल पेवर फक्त बोलून म्हणजेच व्हॉइस कमांडवर यूपीआय पेमेंट करता येणार असल्याची माहिती भारतातील गुगल पे चे प्रमुख उत्पादन व्यवस्थापक, शरथ बुलुसु यांनी दिली. या नव्या व्हॉइस फीचरद्वारे (Voice Assistance Feature) डिजिटल […]Read More

देश विदेश

गंगा-यमुनेचे पाणी स्नानासाठी अयोग्य: प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. महीन्याभराहून अधिक काळ सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात गंगा-यमुना संगमावर ५४ कोटींहून अधिक भाविकांनी स्नानाचा आनंद घेतला. त्यानंतर आता प्रदुषण नियंत्रण मंडळाने एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (CPCB) एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये […]Read More

बिझनेस

अदानी समुहाचा आता शिक्षण क्षेत्रातही प्रवेश

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समूह देशातील विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने विस्तार करत आहे. सर्वच उद्योगांमध्ये अग्रेसर असलेला अदानी समुह आता शिक्षण क्षेत्रातही प्रवेश करणार आहे. अदानी समुहाने देशाच्या विविध भागात शाळा सुरु करण्यासाठी २००० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. या पैशातून देशभरात २० शाळा उभारण्यात येणार आहेत. या शाळांमधील ३० टक्के […]Read More