नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या भारतीय लोकांना होत असलेल्या जीवनशेैलीबाबतच्या आजारांमध्ये वाढते वजन ही गंभीर समस्या होत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लठ्ठपणाविरुद्ध मोहीम सुरू केली. यासाठी त्यांनी विविध क्षेत्रातील 10 प्रमुख व्यक्तींना नामांकित केले. यामध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उद्योगपती आनंद महिंद्रा आणि मनु भाकर यांसारख्या […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. महानगरी मुंबईमध्ये देखील गेल्या आठवड्यापासून तापमान झपाट्याने वाढत आहे. यावर्षी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर म्हणजेच ७ लाख ४७ […]Read More
ठाणे दि २४:– शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचे आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच, त्यावर आता नाईक यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले. जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिवहन […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीत पार पडलेले 98 वे मराठी साहित्य संमेलन म्हणजे राजकीय व्यासपीठ होते अशा पद्धतीचा आरोप मला अमान्य आहे, तरीही उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका परिसंवादात व्यक्त केलेले वक्तव्य अनावश्यक होते असे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि त्यांचे सहाय्यक कोण असावेत ते नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असून त्याबाबत कोणालाही शंका असण्याचे काहीही कारण नाही असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे. काही मंत्र्यांना त्यांना हवे तसे सहाय्यक मिळत नसल्याबद्दलची तक्रार त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गेल्या तीन वर्षांत ६,०७० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, या कालावधीत ५,७१५ कर्णबधिर रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानांतर्गत मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये या कालावधीत एकूण दीड लाख कर्णबधिर रुग्णांची तपासणी करण्यात आली. […]Read More
मुंबई,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Renault आता त्यांच्या गाड्यांमध्ये CNG पर्याय देखील देणार आहे. कंपनीने आज ही माहिती दिली. हॅचबॅक कार रेनॉल्ट क्विड, बजेट एमपीव्ही रेनॉल्ट ट्रायबर आणि रेनॉल्ट किगर ही सीएनजीसह कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून लाँच करेल. Renault आता त्यांच्या गाड्यांमध्ये CNG ऑप्शन देखील देणार आहे. परंतु त्यांना फॅक्ट-फिटेड सीएनजी दिले जाणार नाही; त्याऐवजी, […]Read More
पुढील काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होणार असून राज्यभरातील नागरिकांना उष्णतेच्या झळा जाणवणार आहेत. मुंबई कोकणसह ५ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या चार दिवसात तापमान 36-38 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. कोकणातही येत्या 3 दिवसांत 2-3 अंशांनी कमाल तापमानात वाढ होणार […]Read More
पुणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूरदर्शनचे प्रख्यात वृत्तनिवेदक आणि बालसाहित्यिक प्रा अनंत भावे (८८) यांचे काल रात्री पुणे येथे निधन झाले. प्रा. भावे यांनी ९० च्या दशकात दूरदर्शनवर सायंकाळच्या सत्रातील बातम्यांचे निवेदन केले. त्यांच्या निवेदन शैलीला एक खास ओळख होती. तब्बल २५ वर्षे त्यांनी हे काम केले. वृत्तनिवेदनासोबतच ते एक उत्कृष्ट बालसाहित्यिक म्हणूनही […]Read More