mmcnews mmcnews

राजकीय

संख्याबळ मिळाले, तर सत्ता स्थापन करू शकणाऱ्या सोबत राहणार

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे. शनिवारी(दि.23) राज्यात मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल […]Read More

ऍग्रो

सीसीआय मार्फत कापूस खरेदीला सुरुवात…

जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्याच्या मंठा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (भारतीय कपास निगम) सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी कापसाला 7 हजार 521 रुपये भाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी घेऊन येण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, बँकेशी आधारकार्ड आणि आधारकार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा असं आवाहन […]Read More

मराठवाडा

सरकार स्थापनेनंतर मराठा आरक्षणासाठी सामुहिक उपोषण

जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. राज्यातले मराठे अंतरवाली सराटीत येणार असून सामुहिक आमरण उपोषण होणार असं जरांगे म्हणाले. देशात कधी इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसेल, तितकं मोठं उपोषण अंतरवाली मध्ये होणार असल्याचंही जरांगे म्हणाले. […]Read More

मनोरंजन

इफ्फीच्या फिल्म बाजारात फिल्मसिटीचा स्टॉल ठरतोय लक्षवेधी

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार मध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचा स्टॉल उभारण्यात आला असून हा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेष म्हणजे फिल्म बाजारामध्ये या स्टॉलची चर्चा असून अनेक देश विदेशातील कलाकार,दिग्दर्शक, निर्माते तसेच अधिकारी स्टॉलला भेट देऊन कौतुक करत आहेत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विषारी वायू गळतीमुळे सांगली जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

सांगली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात बोंबाळेवाडी, शाळागाव येथे म्यानमार कंपनीत विषारी वायू गळतीमुळे तिघा महिलांचा मृत्यू झाला आहे. सुचित्रा उथळे, नीलम मारुती रेठरेकर आणि किशोर सापकर अशी मृतांची नावे आहेत. घटनेत सदर कारखान्यातील कामगार आणि नागरिक असे सात जण गंभीर जखमी झाले. प्राजक्ता मुळीक, वरद मुळीक, शुभम यादव,सायली पुजारी, माधुरी […]Read More

राजकीय

मतदान चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय कुरबुरीना सुरुवात

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र विधानसभेच्या १५ व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानानंतर लगेचच काल अनेक मतदाणोत्तर अंदाज जाहीर झाले , त्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे दिसून आले तरी बऱ्याच चाचण्यांमध्ये महायुती आघाडीवर असल्याचे सांगितले गेले आहे मात्र एकीकडे या चाचण्या जाहीर होत असतानाच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कुरबुरीना सुरुवात […]Read More

देश विदेश

भारतीय लष्करात दाखल होणार ‘रोबोटिक डॉग’

नवी दिल्ली, दि. . २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय लष्कर नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये तत्पर असते. आता ‘रोबोटिक डॉग’ शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराला साथ देणार आहेत. आदेश मिळताच ते शत्रूंवर हल्ला करतील. गोळीबार करण्यापासून ते शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यापर्यंत ते रणांगणात आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय असतील. फक्त एक तास चार्ज […]Read More

महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एमएसबीएसएचएसईची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in येथे आजपासून (२१ नोव्हेंबर २०२४) दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक उपलब्द करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात […]Read More

महिला

भारताने जिंकली महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी

राजगीर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारमधील राजगीर येथे झालेल्या महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीवर भारताने कब्जा केला आहे. टीम इंडियाने चीनचा 1-0 असा पराभव केला आहे. तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या सामन्याच्या 31व्या मिनिटाला दीपिकाने टीम इंडियासाठी पहिला गोल केला, ज्यामुळे भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 30 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना […]Read More

देश विदेश

दिल्लीत ई-कॉमर्स कंपन्यांना फटाक्यांची विक्री त्वरित थांबवण्याचे निर्देश

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा सुरू होताच दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील राजधानी दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दिल्ली पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्यांना राजधानीत ऑनलाइन फटाक्यांची विक्री त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी (20 नोव्हेंबर) ई-कॉमर्स कंपन्यांना ई-मेल केले. सर्वोच्च न्यायालयाच्या […]Read More