mmcnews mmcnews

राजकीय

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

मुंबई दि २१ : नाशिकमधील स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. काल २० मार्च रोजी चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला होता. त्यानंतर […]Read More

सांस्कृतिक

बहारदार गायनाने पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सुरुवात

पुणे प्रतिनिधी– स्वर्गीय सूर, तबल्याचा ठेका, टाळांचा निनाद आणि हार्मोनियमच्या मंजुळ साथीत भारावलेल्या वातावरणात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा बहारदार शुभारंभ झाला. आपला परिसर आणि तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित विसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा प्रारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महोत्सवाचे संयोजक माजी विरोधी पक्षनेते उज्वल […]Read More

राजकीय

मुंबईत तीन दिवसीय मिलेट महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. २० : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत या महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त […]Read More

ट्रेण्डिंग

बदलापूरहून फक्त अर्ध्या तासात गाठता येणार नवी मुंबई

ठाणे, दि. २० : ठाणे जिल्ह्यातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर-अंबरनाथ मधील नागरिकांचा प्रवास गतिमान होण्यासाठी कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच नवी दिल्लीत अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आलीय.या नव्या […]Read More

ट्रेण्डिंग

देशात आता LPG ATM सुरू

मुंबई, दि. २० : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) गुरुग्राममध्ये LPG ATM सुरू केले आहे. हा एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आला आहे. लोकांना दिवसाचे २४ तास सहज आणि जलद गॅस उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी असलेल्या भारत गॅसने ही सुविधा एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू केली आहे. सध्या, ही […]Read More

ट्रेण्डिंग

अजब – जुहू चौपाटीवर समस्या ऐकण्यासाठी २५० रुपये, सोबत रडण्यासाठी

मुंबई, दि. २० : वेगवान जीवनशैली आणि कामाच्या ताणामुळे आजकाल अनेकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. मनमोकळ्या संवादाचा अभाव, कुटुंबापासून कामानिमित्ताने दूर राहणे अशा विविध कारणांमुळे लोकांमध्ये एकटेपणाचे प्रमाण वाढत आहे. या समस्येवर मुंबईतील जुहू चौपाटीवर एका पठ्ठ्याने चक्क लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी सशुल्क सुविधा सुरू केली आहे. मुंबईतील जुहू चौपाटीवरील […]Read More

अर्थ

2.09 रुपयांनी महागलं प्रीमियम पेट्रोल

मुंबई, दि. २० : देशात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून ग्राहकांना आता प्रति लिटर २.०९ रुपयांनी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. स २० मार्च २०२६ पासून प्रति लिटर ₹२.०९ ते ₹२.३५ ने वाढले आहेत. त्यामुळे BPCL च्या Speed, HPCL च्या Power आणि IOCL च्या XP95 […]Read More

ऍग्रो

अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 11. 5 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान

छ.संभाजी नगर, दि. २० : गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये काढणीला आलेले पिक पाऊस आणि गारपिटीमुळे मातीमोल झाले आहे. मराठवाडा विभागात पिकांचे सर्वांधिक नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १६ मार्चपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ११,५०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी […]Read More

पर्यावरण

वनविभाग मासांहारी प्राण्यांना अधिवासातच देणार पुरेशी शिकार

मुंबई, दि. 20 : जंगलतोडीमुळे नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने आणि पुरेशा शिकारी अभावी वाघ, बिबट्यांसारखे मांसाहारी प्राणी आता मानवी वसाहतीमध्ये राजरोस फिरू लागले आहेत. यामुळे दिवसेंदिवस मानव-प्राणी संघर्ष वाढत चालला आहे. यावर उपाय म्हणून आता वनविभागाने मासांहारी प्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पुरेशी शिकार उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज एका पत्रकार […]Read More

देश विदेश

12 मुस्लिम देश इस्लामविरोधात आले‌ एकत्र

मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. इराणकडून सातत्याने होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सौदी अरेबिया, पाकिस्तानसह १२ मुस्लिम देश एकत्र आले असून त्यांनी तेहरानला कठोर इशारा दिला आहे. या बैठकीनंतर इराणविरोधात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.सहभागी देश: अझरबैजान, बहरेन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात (UAE) इराण कडून सातत्याने होणारे […]Read More