Month: March 2024

बिझनेस

DGCA ने Air India ला ठोठावला 80 लाखांचा दंड

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा ग्रुपच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या एअर इंडिया (Air India)ला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA- डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) ने मोठा दंड ठोठावला आहे. Air India ला तब्बल ८० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासंदर्भातील DGCA ने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स (FDTL) आणि थकवा […]Read More

विदर्भ

सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला नारळाच्या होळीने झाली सुरुवात…

बुलडाणा, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलडाणा जिल्हातील सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीने झाली. दरवषी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्गावर चादर चढाविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा अर्चा केल्या जाते त्यांनतर होळीला पेटविली जाते या होळीमध्ये भाविक नारळ अर्पण […]Read More

राजकीय

राजकीय रंगाने रंगली धुळ्यात धुळवड

धुळे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोलची च्या फटक्यांची होळी धुळ्यात सुप्रसिद्ध आहे धुळ्यात रंगणारी धुळवड ही होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगते परंतु धुळ्यात गेल्या काही वर्षापासून पीजी फाउंडेशनच्या वतीने सर्वपक्षीय होळी भगवा चौकात साजरी केली जाते, यात एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले सर्वजण सहभागी होतात. धुळ्याचे विद्यमान खासदार भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम […]Read More

कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लागल्या रांगा

महाड, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळी सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्याने रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. इंदापूर ते माणगाव दरम्यान ४ ते ५ किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रवाशी अर्ध्यातच अडकून पडले होते. महामार्ग चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही, […]Read More

महानगर

राज्यात नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. 17 ते 22 मार्च 2024 या सहा दिवसांच्या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी […]Read More

मनोरंजन

या दिवशी रिलिज होणार ‘महापरिनिर्वाण’ चित्रपट

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेला ७ डिसेंबर १९५६ या दिवशी मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रा त्यांच्या राजगृह या मुंबईतील निवासस्थानावरून खोदादाद सर्कल, परळ ट्राम नाका, एल्फिन्स्टन ब्रिज, गोखले रोड, रानडे रोड अशा मार्गाने शिवाजी पार्कजवळील चौपाटीवर पोहोचली. लाखोंच्या संख्येत लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. […]Read More

महानगर

३५ सोमालियन समुद्री चाच्यांना भारतीय नौदलाने केले जेरबंद

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाने मोठी कामगिरी करत ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना ताब्यात घेतले आहे. सोमालिया किनारपट्टीजवळ एका मोहिमेत पकडण्यात आलेले ३५ समुद्री चाच्यांना घेऊन युद्धनौका आयएनएस कोलकाता आज सकाळी मुंबईत दाखल झाली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या समुद्री चाच्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले. नौदलाने ही कारवाई ‘ऑपरेशन संकल्प’च्या माध्यमातून केली. या […]Read More

देश विदेश

रशियाच्या राजधानीत आयसीसचा दहशदवादी हल्ला, १३३ जणांचा मृत्यू

मॉस्को, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात १३३ जणांचा मृत्यू झाला असून १४५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. दहशतवादी संघटना आयसिसनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आमच्या हल्लेखोरांनी मॉस्कोच्या वेशीवरील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये हल्ला केला, अशी माहिती आयसिसनं त्यांच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिली […]Read More

मनोरंजन

‘कोण म्हणतं टक्का दिला?’ चे रंगभूमीवर पुनरागमन

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमी गाजवणारे संजय पवार लिखित ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता नवीन कलाकारांच्या संचात पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. अष्टपैलू अभिनेता उपेंद्र लिमये याने तेव्हांच्या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. आरक्षणाचा प्रश्न प्रखरपणे मांडणाऱ्या या नाटकाने तेव्हा मोठी लोकप्रियता मिळवली होती. नाटककार आणि पटकथा […]Read More

पर्यावरण

कानपूरमध्ये होळीची अनोखी तयारी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुनैदपूर येथील श्री बालाजी दरबारातील 16वी नारळाची अप्रतिम होळी प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश देईल. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुमारे 10 हजार नारळाच्या होलिका तयार करण्यात आल्या आहेत. हा देखावा पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविकांची गर्दी होणार आहे. मागील वर्षांप्रमाणे यावर्षीही भोगणीपूर तहसील परिसरातील जुनेदपूर येथील श्री बालाजी दरबार येथे […]Read More