मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ५ वृक्ष जर लावले तर ७०० कोटी वृक्ष लागवड होऊ शकते. त्यामुळे या पर्यावरणीय जनजागृतीसाठी इको फ्रेंडली लाईफ या सामाजिक संस्थेने देशभरात आंबा, जांभूळ यासारखी ११ प्रकारची वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे . […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील 69,000 शिक्षक भरतीसाठी गुणवत्ता यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. खरं तर, 16 ऑगस्ट रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने यूपीमध्ये 2019 मध्ये झालेल्या 69,000 शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी रद्द करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने सरकारला तीन महिन्यांत नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्यास सांगितले होते. […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादाला अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. त्यातच आता या योजनेबाबत येणाऱ्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय जोरकसपणे कामाला लागलं आहे. या योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे पैसे बँकांकडून कापण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. याची दखल घेत महायुती सरकारने लवकरच बँकांशी […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरामध्ये गणपती मंडळांनी विविध विषयांवरील देखावे सादर केले आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावाहून देखील भाविक येत आहेत. सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे पहायला मिळत आहेत. ते पाहण्यासाठी लहान-थोर गर्दी करू लागले आहेत. बाजीराव रस्त्यावर अभिनव कला महाविद्यालयापासून वाहनांना बंदी घालण्यात आली असून, मोठी वाहने सोडली जात नाही. जेणेकरून […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय मराठी शो होम मिनिस्टर आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. गेल्या २० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शो होस्ट आदेश बांदेकर यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. “पैठणी घेऊन येणार नाहीत भावोजी?” या त्यांच्या ओळखीच्या संवादाने घराघरात पोहोचलेल्या आदेश बांदेकरांनी हा निर्णय घेतल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि […]Read More
वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाचे स्टारलायनर यान शुक्रवारी रात्री पृथ्वीवर परतले. या यानातून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर पृथ्वीवर परतणे अपेक्षित होते. मात्र यानात बिघाड झाल्याने दोन्ही अंतराळवीर अद्याप आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर अडकून पडले आहेत.अवकाश तळावरून वेगळे होऊन पृथ्वीच्या दिशेने निघालेले स्टारलायनर यान सहा तासांच्या प्रवासानंतर पॅराशूटच्या साह्याने […]Read More
पॅरिस, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी कामगिरी भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये केली आहे. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण २९ पदके जिंकली असून यात ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 16 व्या स्थानवर मिळवले आहे. याआधी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात फारसे […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मोठ्या भक्ती भावाने काल आगमन झालेल्या गणरायाचे आज दीड दिवसानंतर विसर्जन करण्यात आले. काल अतिशय आनंदाने तसेच भक्तीभावाने घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे आज राज्यभरात वाजतगाजत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. राज्यभरातील नदी , तलाव , पाणवठे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेल्या कृत्रिम हौदामध्ये नागरिकांनी विसर्जन केले. पुण्यात नदीपात्रामध्ये […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन तथा उडीद ही दोन पिके […]Read More
छ संभाजीनगर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सध्या सर्वत्र विविध प्रदूषणामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक जण काम करीत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील डॉ संतोष पाटील यांनी अवघ्या एका रुपयाचा खर्च करून सुपारी पासून सुपारेश्र्वर इको फ्रेंडली गणेशा साकारला आहे. या गणेशा च्या सजावटीसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात […]Read More