mmcnews mmcnews

अर्थ

वर्ष 2026 साठी RBI कडून महागाई दर निश्चित

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर ५.५ टक्के कायम ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या टॅरिफ धमक्यांवर आरबीआय थांबा आणि पहा धोरण स्वीकारत आहे. दर निश्चित करणाऱ्या पॅनेलनेही आरबीआयचा पवित्रा तटस्थ ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.नागपूर येथील ईटी मेक इन इंडिया एसएमई प्रादेशिक शिखर परिषदेत स्थानिक एमएसएमईंना बळकटी […]Read More

ट्रेण्डिंग

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वितरणावर देखरेख अशक्य

मुंबई, दि. ६ : मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी वितरणावर न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही, परंतु ज्या उद्देशासाठी हा निधी वापरला जात आहे, त्याचा गैरवापर होणार नाही, निधी वाटपात कोणतेही विचलन होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करत एक याचिका फेटाळून लावली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी ज्या कारणासाठी स्थापन […]Read More

ट्रेण्डिंग

‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून सन्मान

नवी दिल्ली, दि. ६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या प्रमुख उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एका महिन्यात या उपक्रमाने 3.53 कोटींहून अधिक नोंदणी आणि टेलिव्हिजनवर 21 कोटींहून अधिक प्रेक्षक मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या उपक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात

कोल्हापूर, दि. ६ : न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूरातील नांदणी मठातील प्रसिद्ध महादेवी उर्फ माधुरी हत्तीण रिलायन्सच्या वनतारा प्रकल्पात पाठवण्यात आली होती. यावरुन गेले आठवडाभर कोल्हापूरकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विविध माध्यमांतून दिसणारा कोल्हापूरकरांचा रोष पाहता,राज्य सरकारने देखील यात लक्ष घातले होते. अखेर आज वनताराने नमते घेतले असून लवकरच महादेवी कोल्हारात परतणार आहे. वनताराचे साईओ विहान कर्णीक […]Read More

ट्रेण्डिंग

उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप

उत्तरकाशी, दि. ६ : उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावात काल खीरगंगा नदीच्या उगमस्थानी अचानक आलेल्या जलप्रलयामुळे (flood) हांहाकार माजला. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील ५१ पर्यटक अडकले आहेत. ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली. यामध्ये नांदेडचे ११, सोलापूरचे ४ आणि इतर जिल्ह्यातील ३६ पर्यटकांचा समावेश आहे. याशिवाय बचावपथकाला अजून एक मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेतील […]Read More

खान्देश

सहावीतल्या चिमुरडीचा शाळेच्या गेटवरच हार्ट अटॅकने मृत्यू

नाशिक, दि. ६ : नाशिकमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणाऱ्या अवघ्या 12 वर्षांच्या विद्यार्थिनीचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. श्रेया किरण कापडी असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. ती इयत्ता सहावीत शिकत होती. आज सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली. मात्र शाळेच्या गेटमधून […]Read More

ट्रेण्डिंग

या दिवशी सुरु होणार नागपूर-पुणे वंदे भारत

पुणे, दि. ६ : देशातील तीन मार्गांवर नव्यानं वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत माहिती दिली. नागपूरमधील अजनी रेल्वे स्थानकातून वंदे भारत एक्स्प्रेस 10 ऑगस्टला पुण्यातील हडरपसर रेल्वे स्थानकाकडे रवाना होईल. या दोन्ही स्थानकांमधील […]Read More

राजकीय

खा. संजय दिना पाटील यांनी केले उद्धव ठाकरे यांचे स्वागत

मुंबई, दि. ६ – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार असून त्याचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे मुंबई पासून दिल्ली पर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे दिल्ली दौ-यावर गेले आहेत. उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी दिल्ली येथे उध्दव […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नाविन्यपूर्ण शिक्षण हेच राष्ट्राच्या प्रगतीचे साधन

पुणे, दि ६- एकविसाव्या शतकात शिक्षणाची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. शिक्षण आता केवळ विद्यापीठे, प्रयोगशाळा, पदवी घेण्यापर्यंत मर्यादित राहिले नसून ते राष्ट्राच्या प्रगतीचे एक साधन बनले आहे. त्यामुळे, विकसित भारत@२०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रात राष्ट्रासमोर असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. धाडसी विचारांनीच भारत देश घडला असून, विद्यार्थ्यांनीही […]Read More

राजकीय

लोढा व अदानींच्या इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा

मुंबई, दि. ६ — मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून […]Read More