mmcnews mmcnews

देश विदेश

भाजपाशी हातमिळवणी करून निवडणूक आयोगाची प्रक्रियाच उध्वस्त करण्याची योजना

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने भाजपाशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप करत जोरदार टिका केली. मतदार यादीतील अनियमिततेवर १ तास ११ मिनिटे २२ पानांचे सादरीकरण दिले. राहुल गांधी यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि सांगितले की, मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत. राहुल म्हणाले की, लाखो कागदपत्रांची मॅन्युअली तपासणी करून आम्ही […]Read More

राजकीय

कालचे कबुतरखान्याचे आंदोलन चुकीचे, आरोग्याचा प्रश्न महत्वाचा….

मुंबई दि ७– उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कबुतरे आरोग्यासाठी घातक आहेत , त्यामुळे नागरिकांचे आरोग्य जास्त महत्वाचे आहे, त्या पार्श्वभूमीवर काल दादर इथे झालेले कबुतरखान्याचे आंदोलन चुकीचे होते, मात्र त्यात जैन समाज नव्हता , त्यात दुसरेच कोणी घुसले होते असे मत कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे. आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी […]Read More

महानगर

ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर…

मुंबई दि ७:– मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांची निवड झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. शाल, श्रीफळ, रुपये ११,०००/-, आणि सन्मानचिन्ह […]Read More

महानगर

दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

मुंबई दि ७– दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राखी बांधली व ओवाळले. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर, भालिवली, जिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी महिलांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली राखी बांधली. रक्षाबंधनानिमित्त विविध संस्थांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

हत्तीण माधुरीच्या स्थलांतराचा पडसाद आता विदर्भातही..

वाशीम दि ७:– कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात अनेक वर्षांपासून असलेल्या ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ या हत्तीणेला अलीकडेच ‘वनतारा’ या संस्थेत हलविण्यात आले. स्थलांतरानंतर कोल्हापूरकर आक्रमक झाले होते मात्र अजूनही तिला परत पाठवले नसल्याने आता त्याचे पडसाद विदर्भातही उमटू लागले आहेत. त्याअनुषंगाने आज वाशीम शहरात मूक मोर्चा काढण्यात आला आहे. बालाजी मंदिरापासून सुरू झालेला हा […]Read More

विदर्भ

गडचिरोलीच्या शिंदे गटात तुफान राडा..

गडचिरोली दि ७:– राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला आणि ते एकमेकांवर भिडल्याचा प्रकार गडचिरोलीच्या सर्किट हाऊस मध्ये बघायला मिळाला. शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून संदीप ठाकूर तर अहेरी जिल्हाप्रमुख म्हणून राकेश बेलसरे सध्या कार्यरत आहेत. […]Read More

राजकीय

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असंवेदनशील केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस खासदारांचे ठिय्या आंदोलन

दिल्ली, दि ७मराठवाड्यातील काही जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. शासनाकडे वारंवार मागणी करून देखील खतपुरवठा करण्यात आलेला नाही. जालना जिल्ह्यात बोगस खताचे प्रमाण वाढले आहे. अधिकारी वर्गाला हाताशी धरून कृत्रिमरीत्या खताचा तुटवडा केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना चढ्या दराने खत खरेदी करावे लागते.वेळीच खत उपलब्ध न झाल्याने त्याचा पिकावर परिणाम होतो. शेतकऱ्यांना सामोरं जावे लागणाऱ्या […]Read More

महानगर

‘वृक्षबंधन’ झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ठाणे दि ७– पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मो. ह. विद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात ‘वृक्षबंधन’ हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला. मोह विद्यालयाचे ४० विद्यार्थी, वनशक्ती […]Read More

मराठवाडा

सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर…

धाराशिव दि ७ — सोयाबीन या खरीप हंगामातील पिकाच्या उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संशोधनातून तयार करण्यात आलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान धाराशिव तालुक्यातील उपळा या गावातील २० शेतकऱ्यांच्या शेतात कार्यान्वित करण्यात आले आहे. यात स्वयंचलित हवामान केंद्र […]Read More

विदर्भ

सोयाबीनची वाटचाल ५ हजाराच्या दिशेने, तीन वर्षांनंतर दरात उच्चांकी झेप…

वाशीम दि ७:– वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत असून, लवकरच पाच हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४९५० रुपये इतका दर मिळाला असून, हा यंदाच्या हंगामातील उच्चांकी दर ठरला आहे. विशेष म्हणजे, सुमारे तीन वर्षांनंतर एवढ्या दराची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षांपासून […]Read More