mmcnews mmcnews

राजकीय

भिमसैनिकांडून स्मारकाच्या नियोजित जागेवर बाबासाहेबांच्या नावाची कमान

पुणे, दि १४: मंगळवार पेठ येथील एमएसआरडीसी ची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी अर्थात बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री बहाद्दर भीमसैनिकांनी जागेच्या गेटवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची नियोजित जागा असा फलक लावला आहे. हा फलक लावल्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये चैतन्य उसळले असून उद्याचे आंदोलन अधिक व्यापक […]Read More

महानगर

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबई, दि . १४ – काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण […]Read More

सांस्कृतिक

“मीरा-भाईंदरमध्ये पहिल्यांदाच ‘संस्कृतीची दहीहंडी २०२५’ – विश्वविक्रमी जल्लोषासाठी सज्ज!”

मिरा-भाईंदर दि १४:– प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि नवघर नाक्याची मानाची हंडी वंदना विकास पाटील जनहित संस्थेतर्फे मिरा-भाईंदर शहरात पहिल्यांदाच सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचा गौरव करणारा “संस्कृतीची दहीहंडी २०२५” हा भव्य व विश्वविक्रमी दहीहंडी उत्सव शनिवारी दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी नवघर मराठी शाळा मैदान, हनुमान मंदिरासमोर, नवघर नाका, भाईंदर (पूर्व) येथे भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार […]Read More

सांस्कृतिक

संस्कृतीच्या दहीहंडीसाठी स्पेनमधील १११ मॅरेक्स गोविंदा दाखल

ठाणे, दि १४ठाण्यातील प्रतिष्ठीत संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील १११ गोविंदा दाखल झाले आहेत. आज पाम क्लब येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी स्पेनमधील  मॅरेक्स दे सॅाल्ट (Marrecs de salt) १११ गोविंदांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.दहीहंडी महोत्सवातून दोन देशातील संस्कृतीचे आदान प्रदान होत आहे ही आपल्या […]Read More

महानगर

मिरा-भाईंदर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शासनाची जमीन मंजूर

मिरा-भाईंदर दि १४:– मिरा – भाईंदर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना व इतर वाहतूक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मोजे उत्तन, ता. ठाणे, सर्वे क्र. २०३/३ येथील ०.४७० हेक्टर सरकारी जमीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (Sub RTO Office) उभारण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत मंजूर करण्यात आली आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नोंदणी विभागाची सेवा तीन दिवस बंद

पुणे दि.१४ :- नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे, दि.14 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजल्यापासून ते दि.17 ऑगस्ट 2025 रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील.तरी संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र […]Read More

विदर्भ

बेंबळा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले.

यवतमाळ दि १४ — यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 25 सेंमी ने उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून 126 घनमीटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रिया यशस्वीपूर्ण, दर्शन सुरू….

कोल्हापूर दि १४–कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रिया गेल्या तीन दिवसात यशस्वीपणे पार पडली. आज सकाळी साडेआठ वाजता मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी सुरू झाले. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय पूरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मूर्तीची संवर्धानासाठी पाहणी करण्याची मागणी केली […]Read More

राजकीय

कबुतरांना खाद्यापेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्वाचे, उच्च न्यायालयाने सुनावले

मुंबई, दि. १३ : गेल्या पंधरादिवसांपासून दादरमध्ये भर वस्तीत असलेल्या कबुतरखान्याचा मुद्दा पेटला आहे. याबाबत जैन समाज आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये कबुतरे महत्त्वाची की नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे या दोन मुद्द्याबाबत संघर्ष सुरु आहे. मुंबई मनपाने न्यायालयाच्या आदेशाने कबुतरखाना बंद करुनही काही जैन धर्मिय तो सुरु करावा यासाठी आक्रमक होत आहे. या सर्व प्रकरणाबाबत आज मुंबई […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अविश्वास ठरावावर उपसरपंच बाईंनी स्वतःविरोधातच केले मतदान

कोल्हापूर, दि. १३ : कोल्हापूरच्या खिद्रापूर गावातील ग्रामपंचायतीत एक विचित्र प्रकार घडला आहे. अविश्वास ठरावावरील मतदानात स्वतःविरोधातच मतदान करून एका महिलेने उपसरपंचपद गमावले आहे . हा प्रकार समजल्यानंतर महिलेने तहसीलदारांपुढे गोंधळ घातला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सदर महिलेने हा प्रकार मुद्दाम केला की अनावधानाने घडला हे अजून स्पष्ट झाले नाही. झाल्या प्रकाराची कोल्हापूरच्या […]Read More