mmcnews mmcnews

महानगर

सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापराचे सर्वंकष धोरण जाहीर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापरासाठी एक व्यापक धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे लवकरच गृहनिर्माण संस्था, औद्योगिक वसाहती आणि इतर नागरी भागांमध्ये बागकाम, फ्लशिंग, वाहन धुणे आणि अग्निशमन यांसारख्या कामांसाठी शुद्ध केलेल्या सांडपाण्याचा वापर अनिवार्य होणार आहे. गोड्या पाण्याचा वापर मर्यादित करून पर्यायी स्रोत उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट […]Read More

मनोरंजन

सुप्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धनचे दिग्दर्शनात पदार्पण

मुंबई, दि. 3 : फास्टर फेणे, डबलसीट, बालक-पालक, सिंघम अगेन अशा विविध चित्रपटांचे लेखक क्षितिज पटवर्धन आता दिग्दर्शन म्हणून पदर्पण करत आहे. उत्तर हा आई मुलाच्या नात्यांची आजच्या परिभाषेतील गोष्ट सांगणारा त्यांचा चित्रपट १२ नोव्हेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे यात आईची भूमिका करणार आहेत तर अभिनय बेर्डे मुलाची भूमिका करणार आहे. […]Read More

मनोरंजन

शाह बानो प्रकरणावर आधारित चित्रपट अडकला वादात

मुंबई, दि. ३ : यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘हक’ हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट शाह बानो प्रकरणावर आधारित आहे, ज्याने १९७० च्या दशकात मुस्लिम महिलांच्या हक्कांची मागणी करून राष्ट्रीय चर्चेला सुरुवात केली होती. शाह बानोच्या मुलीने आता इंदूर उच्च न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे […]Read More

ट्रेण्डिंग

कार्ड नसतानाही ATM मधून काढू शकाल पैसा

मुंबई, दि. ३ : ATM मधून पैसे काढण्यासाठी आता एटीएम कार्डची आवश्यकता नाही. देशभरातील बँकांनी UPI कार्डलेस कॅश विथड्रॉवल फीचर सुरू केले आहे. हे तुम्हाला Google Pay, PhonePe किंवा BHIM अॅपवरून थेट पैसे काढण्याची परवानगी देते. हे फीचर केवळ जलद आणि सोपे नाही तर अत्यंत सुरक्षित देखील आहे. कारण ते कार्ड स्वाइप करण्याची किंवा पिन […]Read More

पर्यावरण

बिबट्याच्या दहशतीमुळे महामार्ग ठप्प

नाशिक, दि. ३ : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची मालिका थांबत नाहीये. गेल्या 5 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जांभूत आणि पिंपरखेड ही गावे बिबट्याच्या हल्ल्याचे केंद्र बनली असून, केवळ एका महिन्यात पिंपरखेडमध्ये 3 मृत्यू झाले आहेत. 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट पुणे-नाशिक […]Read More

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई, दि. ३ : ‘खाष्ट सासू’ तसेच खलनायकी व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दया डोंगरे (८५) यांचे आज निधन झाले. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रुपेरी पडद्यावर आणि रंगभूमीवर एक वेगळी छाप सोडली होती. दया डोंगरे यांच्या गाजलेल्या कामांमध्ये ‘चार दिवस सासूचे’ (मालिका), ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’, ‘मायबाप’, ‘कुलदीपक’ […]Read More

देश विदेश

मदरशातून १५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त

भोपाळ, दि. ३ : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील एका मदरशातून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे महाराष्ट्रातील मालेगावशी कनेक्शन असल्याची माहितीही समोर येत आहे. खांडवा जिल्ह्यातील जवार पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात असलेल्या या मदरशातून आतापर्यंत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी […]Read More

ऍग्रो

सात एकरांतील पिकाचं नुकसान, शेतकऱ्याच्या पदरी विम्याचे अडीच रुपये

पालघर, दि. ३ : लांबलेल्या पावसामुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून मदत मिळण्याचे काम संथावलेले आहे तर पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे. वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतात साचलेल्या पाण्यामुळे भाताला पुन्हा कोंब फुटून हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. […]Read More

राजकीय

ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द

मुंबई, दि. 3 : राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे विधिज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने आज हा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात बार कौन्सिलमध्ये अपील करणार असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले. गेल्या २५ वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत […]Read More

राजकीय

एसटीच्या मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प, ३०० मेगॅवॅट वीजनिर्मितीचे लक्ष

मुंबई दि ३: एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर ‘ सौरऊर्जा प्रकल्प ‘ उभारुन त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये किंमतीची वीजनिर्मिती करण्याचा महत्वकांक्षी ‘ सौर ऊर्जा हब ‘ उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री […]Read More