mmcnews mmcnews

महिला

आयुष्का गादेकरला आशियाई ज्युनियर कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

वाशीम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जयपूर या गावातील रहिवासी आणि कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली आयुष्का पांडुरंग गादेकर हिने थायलंडमधील श्रीराचा येथे १५ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. आयुष्काने अंतिम सामन्यात उझ्बेकिस्तानच्या दिलनुरा अवेझोवाचा पराभव केला. तिच्या या यशामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला […]Read More

आरोग्य

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण

वॉशिग्टन डीसी, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने सर्व जगभरात हाहाकार माजवला होता. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे. लास वेगासमधील एका परिषदेत बोलण्यापूर्वी त्यांची कोरोवाची टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये त्यांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आलं. व्हाईट […]Read More

राजकीय

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निधी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाची मंजुरी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या काही वर्षांपासून ग्रासणारे निराशेचे मळभ आता हळूहळू दूर होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी काही अनुकूल घटना घडत आहेत. उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक […]Read More

देश विदेश

मांसाहारास पूर्ण बंदी घालणारं जगातील पहिलं शहर

भावनगर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शाकहार चांगला की मांसाहार? या विषयी मतमतांतरे दिसून येतात. अनेक वर्ष मांसाहार करणारे लोकं आरोग्य विषयक तसेच अन्य कारणास्तव मांसाहार सोडताना दिसतात. तर पिढ्यांनपिढ्या शाकाहार करणाऱ्या व्यक्ती मांसांहार स्वीकारतानाही दिसतात. शेवटी काय तर कोणत्या प्रकारचे अन्न खावे हा व्यक्तिगत प्राधान्यक्रम आहे. मात्र काही ठरावीक ठिकाणी धार्मिक कारणांस्तव मांसाहारावर […]Read More

ट्रेण्डिंग

NEET परीक्षेचे निकाल केंद्रनिहाय जाहीर करा – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील हजारो विद्यार्थ्यांचे करीअर निश्चित करणाऱ्या NTA द्वारे घेतल्या जाणाऱ्या NEET च्या परीक्षेतील विविध घोळांनी यावर्षी या व्यवस्थेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतर कठोर भूमिका घेत NEET चे निकान नि:संदिग्ध लागावेत यासाठी केंद्र आणि शहर निहाय निकाल जाहीर करण्याचे निर्देश NTA ला दिले आहेत. नीट-यूजी पेपल लीक […]Read More

देश विदेश

CRPF च्या दोन श्वानांचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा पॅरिस ऑलिंपिकच्या सुरक्षा

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जगभरातून विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणारे खेळाडू, त्यांच्या सपोर्ट टिम आणि लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणारे प्रेक्षक यांच्या सुरक्षेची सुसज्ज व्यवस्था केली जात आहे. भारतासाठी याबाबतची विशेष […]Read More

महानगर

बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा २० जुलै रोजी मुंबईत

मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क) : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या” स्थापनेला येत्या २० जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहे.या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीवर प्रकाश टाकण्याकरिता व आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याकरिता बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा शनिवार २० जुलै रोजी, सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण […]Read More

राजकीय

मनोज जरांगे करणार पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा…

जालना, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला 7 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 7 ते 13 ऑगस्ट मनोज जरांगे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दुसऱ्या टप्प्यातील दौरा करणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात होईल तर 13 ऑगस्ट रोजी नाशिक मध्य दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याचा समारोप होणार […]Read More

शिक्षण

राज्यात एक हजार महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रे

मुंबई, दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे,राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. लोढा म्हणाले […]Read More

Uncategorized

तेरेखोल नदीने ओलांडली इशारा पातळी, सतर्कतेचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे.तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडलेली असून सदर नदीच्या संपर्कात येत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कोणीही पाणी असलेल्या रस्त्यांवरून , पुलावरून वाहतूक करू नये, तसेच नदीचे, पुराचे पाण्यात जावू नये अशी सूचना देण्यात आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे येथील पुलावर पाणी […]Read More