लखनौ, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील योगी सरकार नेहमीच वेगवेगळे अप्रचलित निर्णय घेऊन विरोधकांच्या टिकेचे धनी ठरत असते. आता या सरकारने उत्तर प्रदेशात कावड यात्रा मार्गावरील सर्व उपहारगृहाच्या मालकांना त्यांची स्वतःची नावे लावण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार प्रत्येक खाद्यपदार्थाचे दुकान किंवा खाद्यपदार्थाच्या गाडी मालकाला ठळकपणे स्वतःचे नाव लावणे बंधनकारक झाले आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ९ जुलै रोजीच आंतरराष्ट्रीय किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील महिला डॉक्टर विजया कुमारीसह ७ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा (८५) यांचे निधन झाले आहे. ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटासाठी सतराम हे विशेष ओळखले जायचे. ‘जय संतोषी माँ’ने थिएटरमध्ये असा विक्रम केला जो आजपर्यंत कोणताही चित्रपट करू शकला नाही. ‘जय संतोषी मां’चे बजेट फक्त 5 लाख रुपये होते, पण त्यावेळी जवळपास […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दगडूसेठ हलवाई गणपती मंदिर शंभर वर्षांहून प्राचीन आहे, संपूर्ण प्रदेशातील सर्वाधिक भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. नावाप्रमाणेच हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रिय देवता, गणपती किंवा गणेश यांना समर्पित आहे. मंदिरात आकर्षक बांधकाम आहे आणि ते दुरून पाहता येते. मंदिराचे एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत होणारी सर्व कार्यवाही बाहेरून […]Read More
ठाणे, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिव्यांग लोकांमध्ये उपजतच काही कला असतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला,हस्तकला,संगीत अश्या अनेक प्रकारच्या कला सहाय्य्यभूत ठरतात. त्यांच्या ह्या कलागुणांना वाव द्यावा आणि त्यांना आपल्या कलेमार्फत व्यक्त होण्याची संधी मिळावी या उद्देशाने आशीर्वाद फाऊंडेशन,ठाणे ह्या संस्थेतर्फे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा ह्या दोन दिवसांचे औचित्य साधून ठाण्यात १२ जुलै, २०२४ शुक्रवार […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या रविवार, २१ रोजी होणार आहे. या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३०० पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, या अधिवेशनाच्या […]Read More
मुंबई, दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क): पंढरपुरात आषाढी वारीच्या वाटेवर जपान वरून आयात केलेली माझी कार मराठा आरक्षण आंदोलनाचे योध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून जाळली नाही अशी मला खात्री आहे. त्यांचे स्टंट करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनीच जाळली असावी असा आरोप ह भ प अजय बारस्कर महाराज यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या दोन तीन महिन्यापासून संविधान बाबतची सुरू असलेली चर्चा मी ऐकत होतो. मात्र संविधानाची हत्या कुणीही करू शकत नाही असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे दिवंगत पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला. धर्माधिकारी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीचे शिलेदार कै. दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार , ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते रोख पंचवीस हजार आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. […]Read More
कोल्हापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.08 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा 36 फुटावरून वाहत आहे. तर इशारा पातळी 39 इतकी आहे.तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. प्रशासनाने नदीकाठच्या […]Read More