mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

मनोरमा खेडकर यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत

पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीची आई मनोरमा खेडकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. त्याचबरोबर पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत. […]Read More

मनोरंजन

निलेश साबळेच्या हसताय ना… ने तीन महिन्यातच घेतला निरोप

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छोट्या पडद्यावरील सर्वांचाच आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या काही दिवसांपूर्वीच बंद झाला. पण त्यानंतर अभिनेता निलेश साबळे हा ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला होता. पण आता कलर्स मराठीवरील ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रमही अवघ्या तीनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची […]Read More

क्रीडा

दिलदार BCCI! ऑलिंम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना ८.५ कोटींची मदत

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिसमध्ये 26 जुलैपासून ऑलिम्पिक 2024 स्पर्धा खेळली जाणार आहे. यात भारतीय खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मदतीचा हात पुढे केला आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की BCCIकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) 8.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात […]Read More

गॅलरी

विठ्ठल मंदिरात संपन्न झाला महाद्वारकाला

सोलापूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी यात्रेच्या सांगतेसाठी आज महाद्वारकाल्याचा उत्सव झाला. परंपरेप्रमाणे काल्याच्या वाड्यातून मदन महाराज हरिदास यांच्या डोक्यावर पांडुरंगाच्या पादुका बांधण्यात आले. यानंतर विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपामध्ये पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर काल्याची दहीहंडी फोडून महाद्वार काल्याचा उत्सव संपन्न झाला. यानंतर काल्याची आणि लाह्यांची मुक्त उधळण करत मदन महाराज हरिदास […]Read More

महानगर

युपीएससी अध्यक्ष मनोज सोनी राजीनामा प्रकरणाची चौकशी करा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अधिकारी घडवणारी, त्यांची परीक्षा घेणारी संस्था म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. पण पूजा खेडकर प्रकरणामुळे या आयोगावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द होण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाच वर्ष शिल्लक असताना सोनी यांनी अचानक […]Read More

ऍग्रो

बँका पीककर्ज देत नाही, सरकारची बँकांशी मिलीभगत

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्यापारी बँका आणि काही खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करत नाही असे म्हणत असताना सरकारची आणि बँकांची ही मिलीभगत आहे का […]Read More

गॅलरी

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाली असे […]Read More

कोकण

कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळित

सिंधुदुर्ग, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकणातील सर्व जिल्ह्यात कालपासून धुवाधार पाऊस कोसळत असून त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे, कोकणातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत तर काहींनी ही पातळी ओलांडली आहे, त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर खूप वाढला आहे. अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत .कणकवली विभागात […]Read More

महिला

या 2 हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होऊ शकतो Breast Cancer

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील काही संप्रेरकांच्या असंतुलनामुळेही स्तनाच्या ऊतींचा असामान्य विकास होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जसे की स्तनामध्ये गाठ, काखेत गाठ, स्तनाच्या त्वचेचा रंग बदलणे किंवा स्तनाग्रातून स्त्राव होणे. कौटुंबिक इतिहास हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे एक कारण आहे. स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी शरीरातील […]Read More

Uncategorized

भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी एक

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी एक आहे. हे पवित्र मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि पांडवांनी बांधले असे मानले जाते. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेले आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना डोंगराळ भागातून 16 किमीचा प्रवास करावा लागतो. केदारनाथ मंदिर 3583 मीटर उंचीवर आहे आणि हे भगवान […]Read More