mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील पहिला गो पर्यटन प्रकल्प

पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील पहिलाच गो पर्यटन प्रकल्प राबवला जात आहे. इथे सर्व देशी गोवंशी गाईची माहिती मिळणार आहे. मनाच्या शांतीसाठी गाईबरोबर वेळ घालवणे असणे गरजेचे आहे. याच संकल्पनेतून आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. संशोधन केंद्रात 12 प्रकारच्या गाईंच्या ब्रीड […]Read More

पर्यटन

मुंबई ते गोवा प्रवास होणार फक्त ६ तासांत

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले कित्येक वर्ष मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहे. मात्र लवकरच नवीन चौपदरी मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या गोव्याला जाण्यासाठी 12 तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र आता हा वेळ अर्ध्यावर येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मे किंवा जून 2025पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे यावर्षी गणपतीसाठी […]Read More

सांस्कृतिक

पाकिस्तानातून ४०० हिंदूंच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फाळणीच्या वेळी पाकीस्तानात राहण्याचा निर्णय घेणाऱ्या अनेक हिंदूंना आजही भारतभूमीचे वेध लागलेले असतात. देश बदलला तरीही त्यांच्या आस्था, श्रद्धा यांची भारताशी जोडलेली नाळ अद्याप अतूट आहे. हेच आत्ता घडलेल्या एका घटनेवरून दिसून येते. पाकिस्तानमधील कराची येथील जुन्या गोलीमार भागातील हिंदू स्मशानभूमीत वर्षानुवर्षे कलशांमध्ये ठेवलेल्या ४०० हिंदूच्या अस्थी […]Read More

ट्रेण्डिंग

डहाणूतील बोर्डीमध्ये चिकू महोत्सवाचे आयोजन

डहाणू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणूचा परिसर अप्रतिम गुणवत्तेच्या चिकूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मोठा आकार आणि मधुर चव यांमुळे इथले चिकू देशभर प्रसिद्ध आहेत. डहाणू आणि परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या आदिवासींसाठी चिकू उत्पादनामुळे रोजगाराचे चांगले साधन निर्माण झाले आहे. चिकूवर प्रक्रीयाकरून येथे अनेक पदार्थही तयार केले जातात. […]Read More

विदर्भ

सलग 26 तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन

अकोला, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिनाचे निमित्ताने अकोल्यात अजिंक्य फिटनेस क्लब सह विविध संस्थांच्या वतीने सलग २६ तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीस महिन्यांच्या चिमुकल्यासह 87 वर्षांचे जेष्ठ नागरिक सूर्य साखळीमध्ये सहभागी झाले होते. आजच्या काळात योग अत्यंत महत्त्वाचा असून सूर्यनमस्काराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अकोल्यात अखंड […]Read More

राजकीय

विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने जिबीएस रोगाचा प्रादुर्भाव

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यामध्ये विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे जीबीएस या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला असे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना क्लोरीनयुक्त स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली . जीबीएस या […]Read More

राजकीय

उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईज ऑफ डुइंग बिझनेस धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 अर्थात maitri.maharashtra.gov.in या पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या अनावरण प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, […]Read More

देश विदेश

अमेरिकेत घुसखोरी केलेल्या २०४ भारतीय नागरिकांना ट्रम्प सरकारने माघारी पाठवले

अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून तेथील यंत्रणांनी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत हे लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत आहेत. अशा लोकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे. हा सर्व खर्च अमेरिकाच करत आहे. ४ फेब्रुवारीला २०५ भारतीयांना अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले आहे. ट्रम्प यांनी या अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घेतली […]Read More

ट्रेण्डिंग

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकरांनी केले वादग्रस्त विधान

अभिनेते राहुल सोलापूरकर त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी शिवाजी महाराजांनी स्वतःची आग्र्यातील कैदेतून केलेली सुटका ही लाच देऊन केली होती असा उल्लेख केला आहे. राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच ही मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रपती भवनात CPRF अधिकारी पूनम गुप्ता यांचे शुभमंगल

राष्ट्रपती भवनात 12 फेब्रुवारीला महिला अधिकारी पूनम गुप्ता यांचा विवाह सोहळा होणार आहे. पूनम गुप्ता या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर म्हणजे खासगी सुरक्षा रक्षक आहेत. त्यांचं सुरक्षेबाबतच नेतृत्व आणि कार्यशैलीमुळे खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रभावित झाल्या आहेत. याच पूनम गुप्ता यांनी प्रजासत्ताकदिनी पथसंचलनात सीआरपीएफच्या महिला पथकाचं नेतृत्व केलं होतं.Read More