mmcnews mmcnews

महानगर

मुंबई विद्यापीठात स्थापन होणार आदिवासी समुदायावर संशोधन केंद्र

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई विद्यापीठात लवकरच ‘सेंटर फॉर एक्सलेन्स इन ट्रायबल स्टडीज अँड डेव्हलपमेंट’ची स्थापना केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केली. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक […]Read More

देश विदेश

गुजरात पोलीसांनी ताब्यात घेतले १०२४ बेकायदा वास्तव्यास असणारे बांग्लादेशी

अहमदाबाद, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य पोलिसांना धडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यानंतर आता राज्य पोलीस दर बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या पाकीस्तानी आणि अन्य देशांतील नागरिकांचा शोध घेत आहेत. गुजरात पोलिसांनी अवैधरित्या राहणाऱ्या १०२४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर […]Read More

महानगर

एमएमआरडीएने आर्थिक वाढ आणि नाविन्यपूर्णतेमध्ये साध्य केला नवा मापदंड

मुंबई दि २६– सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड निश्चित करत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४–२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये (प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न) तिप्पट म्हणजेच जवळपास ₹१२२ कोटींची भरघोस वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या ₹४२.५ कोटी या उत्पन्नात यंदा थेट १८७ टक्के वाढ झाली आहे. या विक्रमी वाढीमुळे एमएमआरडीएने स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या […]Read More

महिला

मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो?

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिक पाळीच्या दरम्यान त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. महिलांमध्ये हे बदल इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे हे घडते. त्यामुळे या काळात त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. महिलांच्या शरीरात दर महिन्याला हार्मोनल बदल होतात. हे मासिक पाळीच्या चक्रामुळे होते, जे पूर्णपणे नैसर्गिक आहे. मासिक पाळीच्या ३-५ दिवसांपासून ते […]Read More

करिअर

जॉब शोध प्रक्रियेचा अत्यावश्यक भाग…मुलाखत

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुलाखती हा जॉब शोध प्रक्रियेचा अत्यावश्यक भाग आहे आणि त्या अनेक लोकांसाठी तणावपूर्ण असू शकतात. तथापि, योग्य तयारी आणि सकारात्मक वृत्तीने, तुम्ही तुमच्या यशाची शक्यता वाढवू शकता. मुलाखतीच्या तयारीची पहिली पायरी म्हणजे कंपनी आणि नोकरीच्या स्थितीचे आधी संशोधन करणे. हे तुम्हाला कंपनीची मूल्ये, उद्दिष्टे आणि ध्येय समजून घेण्यास मदत […]Read More

महानगर

महाराष्ट्रातून १०७ पाकिस्तानी नागरीक झाले गायब

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता भारत सरकारने कठोर भूमिका घेत पाक विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यांतून पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना पाकमध्ये परत धाडण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारनं शोध मोही […]Read More

ट्रेण्डिंग

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना NSE देणार १ कोटींची मदत

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आशिष चौहान यांनी सोशल मीडियावर ही […]Read More

ट्रेण्डिंग

पहलगाम हल्ल्या प्रकरणी तटस्थ चौकशीसाठी पाकिस्तान तयार

इस्लामाबाद, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये मंगळवार (दि. २२) रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यंटकांचा बळी गेला. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचे पंप्रधान मोदींनी म्हटले आहे. पहलगाम येथे झालेला हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचा दावा भारताने तांत्रिक बुद्धिमत्ता आणि विश्वसनीय माहितीच्या आधारावर केला आहे, या […]Read More

Featured

जागतिक बौद्धिक संपदा दिन: बुद्धी, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा सन्मान

मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) : संपदा, म्हणजेच संपत्ती.. जी आपल्याला स्थावर, जंगम मालमत्ता म्हणजे पैसे, सोनं नाणं, घर वगैरे अशी दृश्य स्वरूपात असलेली संपत्ती चटकन् लक्षात येते. मात्र बौद्धिक संपदा म्हणजे नक्की काय भानगड? हे अनेकांना माहितीच नसतं. निसर्गानं मानवाला काही विशेष बुद्धी वरदान म्हणून दिली आहे. आणि त्या बुद्धीच्याच जोरावर माणसाने इतर प्राण्यांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

पहलगाम हल्ल्याबाबत ट्रम्प यांचे वक्तव्य

पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ लोकांंच्या मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावावर वक्तव्य केले आहे. ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध नेहमीच ताणलेले असतात, पण त्यावर उभयदेश स्वतःच यावर उपाय शोधतील. काश्मीरचा संघर्ष १ हजार वर्षांपासून सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. ट्रम्प यांनी असेही […]Read More