mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

एका वर्षात मिळणार Gratuity चे पैसे

मुंबई, दि. १२ : केंद्र सरकारने कामगार कायद्यात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहे. केंद्र सरकारने चार कामगार कायदे लागू केली. यामध्ये वेतन , औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाज यांचा समावेश आहे. या कोड्समध्ये जुने 29 कायदे एकत्रित करण्यात आले आहेत. आता कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे सलग […]Read More

ट्रेण्डिंग

मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी

वॉशिग्टन, दि. १२ : एलॉन मस्क यांची कंपनी चंद्रावर AI सॅटेलाइट फॅक्टरी उभारणार आहेत. मस्क यांनी सांगितले की, या माध्यमातून त्यांना सूर्याची ऊर्जा कॅप्चर करायची आहे. मस्क यांनी त्यांच्या AI कंपनी XAI च्या अंतर्गत बैठकीचा 45 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात ही माहिती समोर आली आहे. यासाठी मस्क सूर्याच्या एकूण ऊर्जेचा 1% भाग वापरू इच्छितात. […]Read More

ट्रेण्डिंग

जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध

नवी दिल्ली, दि. 12 : वंदे मातरम या गीताची सहा कडवी गाणे बंधनकारक करण्याबरोबरच काल केंद्र सरकारने याबाबतची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सरकारच्या या आदेशाबाबत शीख संघटना दल खालसाने तीव्र आक्षेप घेतला आहे आणि याला शीख ओळख व धार्मिक भावनांच्या विरोधात म्हटले आहे. दल खालसाचे नेते कंवरपाल सिंग बिट्टू यांनी निवेदन जारी करत […]Read More

ट्रेण्डिंग

हे गाव झाले जातमुक्त, ग्रामपंचायतीने केला ठराव

अहिल्यानगर, दि. ११ : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने आधुनिक युगाला साजेसा असा एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. सौंदाळा गावाच्या ग्रामसभेत सरपंच शरद आरगडे यांनी जात हद्दपार करण्याचा, म्हणजेच जातमुक्त गावाचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कोणताही विरोध न करता या ठरावाला संपूर्ण पाठिंबा दिला. गावातील सर्व नागरिक समान असून, ‘माझी जात – […]Read More

ट्रेण्डिंग

‘वंदे मातरम’ साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली, दि. ११ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम्’ या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ मध्ये १५० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व शासकीय कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ वाजवणे बंधनकारक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘जन गण मन’ या […]Read More

ट्रेण्डिंग

शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार होणार बंद…

मुंबई, दि. ११ : राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण मोफत उपचारांची योजना अवघ्या अडीच वर्षांत मागे घेण्यात आली असून आरोग्य विभागाने उपचारांसाठी नवीन शुल्कदर लागू केले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ओपीडी तपासणीपासून विविध तपासण्या, शस्त्रक्रिया, आयसीयू, डायलिसिस, रुग्णवाहिका आदी सेवांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार आहे. मात्र ही शुल्कवाढ फार […]Read More

पर्यटन

ST प्रवासासाठी लागू होणार ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्यात येणार असून, विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आता अनिवार्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवीन कार्डसाठी १९९ रुपये मोजावे लागतील. मात्र, ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड […]Read More

ट्रेण्डिंग

शेतकऱ्यांना आता NA परवानगीची गरज नाही

मुंबई, दि. ११ : जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (NA) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही.आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच NA मानले जाणार आहे. सरकाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जमीन महसूल कायद्यात […]Read More

ट्रेण्डिंग

लेबर कोडमध्ये चित्रपट कलाकारांसाठी स्वतंत्र Rulebook

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र सरकार नवीन कामगार संहितेनुसार चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करेल जेणेकरून त्यांचे हित जपता येईल, अशी माहिती आज राज्यमंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. चित्रपट कलाकारांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या कामगार मंत्र्यांनी सांगितले की, प्रस्तावित नियमावलीचा मसुदा तयार केला जाईल आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भागधारकांकडून सूचना मागवल्या […]Read More

ऍग्रो

RBI बदलणार किसान क्रेडीट कार्डसाठीचे नियम

मुंबई, दि. ११ : देशातील शेतकर्‍यांना जलद आणि सहज कर्ज सुविधा देण्यासाठी RBI ने किसान क्रेडिट कार्ड योजनेत मोठा बदल करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज मिळण्याची शक्यता आहे. तसेच परतफेडीचा कालावधी सुद्धा अधिक असण्याची शक्यता आहे. RBI आता बँकांना इंटीग्रेटेड आणि अपडेटेड मार्गदर्शक सूचना देणार आहे. त्यामुळे कृषी कर्जाचे स्वरुप, मंजूरी आणि वापर याची […]Read More