नवी दिल्ली, दि. 11 : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा पहिला 6-लेन एक्स्ट्राडोसेड पूल किंवा ‘महासेतू’ तयार झाला आहे. हा भारतातील सर्वात लांब एक्स्ट्राडोसेड पूल असेल. हा पूल भूकंप-प्रतिरोधक तंत्रज्ञानाने डिझाइन केला आहे आणि त्याचे अंदाजित आयुष्य 100 वर्षे आहे. आसामचा हा प्रदेश भूकंप झोन-6 मध्ये येतो, त्यामुळे पुलामध्ये विशेष पेंडुलम प्रणाली […]Read More
मुंबई, दि. १० : AI हे सध्याचे सर्वांत उपयोगी साधन असले तरी त्याचा गैरवापरही होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. X (ट्विटर), यू-ट्यूब, स्नॅपचॅट आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जाणाऱ्या AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कंटेंटवर लेबल लावावे लागेल. यासोबतच डीपफेक व्हिडिओ-फोटो देखील 3 तासांत काढून टाकावे […]Read More
मुंबई, दि. १० : नागरीकांना स्वस्त वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या मदतीने ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवीन कॅब सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भाडे निश्चित असणार आहे. पाऊस असो किंवा ट्रॅफिकची गर्दी, हे भाडे कधीही बदलणार नाही. या सेवेमुळे प्रवाशांना रास्त दरात टॅक्सी सेवा मिळेल तर […]Read More
जयपूर,दि. १० : आफ्रिका खंडातील नामिबीयानंतर आता बोटस्वाना या देशातून भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिली. तसेच वाघ संवर्धनाच्या धोरणांचा सर्वांगीण आढावा केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे. राजस्थानच्या अलवर येथे झालेल्या ‘वाघ क्षेत्र राज्यांचे मुख्य वन्यजीव रक्षक आणि व्याघ्र प्रकल्पांचे फील्ड डायरेक्टर्स यांच्या […]Read More
मुंबई, दि. १० : मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेला मालमत्ता कर न भरणारे पालिकेच्या रडारवर आले आहेत. वारंवार सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या २० बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, नोटीस बजावल्यानंतर कर भरणा करावा अन्यथा जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांनी […]Read More
नवी दिल्ली,दि. १० : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे वितरण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. ही कारवाई वेगवेगळ्या ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’वर आणि ‘ऑनलाइन न्यूज फोरम’वर समोर आलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. ज्यात पुस्तकाची ‘प्री-प्रिंट’ प्रत प्रसारित होत असल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ […]Read More
बंगळूरू, दि. १० : येथील स्टार्टअप Sarvam AI ने नवीन बहुभाषिक व्हिजन-लँग्वेज मॉडेल Sarvam Vision सादर केले. हे मॉडेल भारताच्या “सॉव्हरिन AI” मालिकेचा भाग असून जागतिक बेंचमार्कवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. Sarvam Vision हे भारताचे पहिले मोठ्या प्रमाणावरचे बहुभाषिक व्हिजन मॉडेल मानले जात आहे. यामुळे दस्तऐवज बुद्धिमत्ता, स्थानिक भाषांतील माहिती प्रक्रिया, आणि व्यावसायिक अनुप्रयोग अधिक […]Read More
लंडन, दि. ९ : ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठा उलथापालथीचा काळ सुरू आहे. पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्यावर जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित वादळामुळे राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लेबर पक्षातील वरिष्ठ नेत्या आणि सध्याच्या गृहमंत्री शबाना महमूद यांचे नाव पुढे येत आहे. जर त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या तर ब्रिटनला पहिल्यांदाच मुस्लिम पंतप्रधान मिळतील, हा ऐतिहासिक क्षण […]Read More
मुंबई, दि. ९ : मनपा निवडणूकांप्रमाणेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये मतदारांनी महायुतीलाच कल दिला आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात भाजपने सर्वाधिक 7 जिल्हा परिषदांवर आपले वर्चस्व निर्माण केले आहेत. तर सत्ताधारी शिवसेना […]Read More
मुंबई,दि. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी रमाबाई आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे. रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना म्हणून 39 कोटींची साडी बनवण्यात येत आहे. या साडीसाठी 33 कोटींचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर होणार आहे. माता रमाईंच्या स्मरणार्थ गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांनी ही साडी बनवली आहे. […]Read More