mmcnews mmcnews

राजकीय

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खा. डॉ. श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली दि ८ — उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ‘उमेदवाराचे प्रतिनिधी’ म्हणून नियुक्ती केली. या निमित्ताने ‘एनडीए’तला भाजपचा सर्वात विश्वासू आणि जुना मित्र पक्ष या नात्याने शिवसेनेचे खासदार डॉ. शिंदे यांच्यावर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मंगळवारी ९ सप्टेंबर २०२५ […]Read More

राजकीय

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठीसर्व पक्ष संघटनांची मुंबईत एकत्रित बैठक*

मुंबई, दि ८~ बुद्धाया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे जागतिक सर्वोच्च श्रद्धास्थान आहे.तरीही हे श्रद्धास्थान बौद्धांच्या ताब्यात नाही हा मोठा अन्याय आहे.त्याविरुद्ध देशात आंदोलन केले जात आहे.बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला महाराष्ट्रातून ताकद देण्याची गरज आहे.मुंबईत आणि महाराष्ट्रात सर्व बौद्ध समाजाच्या एकजुटीतून. महाबोधी महाविहार मुक्तीचे मुंबईत विराट आंदोलन उभारण्याची गरज आहे.त्यासाठी सर्व बौद्ध समाजाच्या […]Read More

राजकीय

व्हिजन डॉक्युमेंट २०४७ हेच राज्याच्या धोरणात्मक निर्णयांसाठी मार्गदर्शक

मुंबई दि ८:– गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणे तयार करावीत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सह्याद्री अतिथीगृह येथे विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत […]Read More

पर्यटन

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स अहवाल: एअरबीएनबी ने २०२४ मध्ये भारताच्या GDP मध्ये

**नवी दिल्ली, दि ८– एअरबीएनबी च्या विनंतीवर ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने केलेल्या नव्या संशोधनानुसार, २०२४ मध्ये एअरबीएनबी ने भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. या प्लॅटफॉर्मच्या कार्यकलापांमुळे ₹११३ अब्ज आर्थिक मूल्य निर्माण झाले, ज्यामुळे १,११,००० नोकऱ्या निर्माण झाल्या आणि ₹२४ अब्ज वेतन उत्पन्न झाले. अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतातील एअरबीएनबी पाहुण्यांपैकी सुमारे ९१% देशांतर्गत प्रवासी होते, जे २०१९ मधील […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सिरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर यांची १५०० वी जयंती

पुणे, दि ८: सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती जगभराप्रमाणे पुणे शहरांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने  साजरी करण्यात आली . यंदाची वर्ष हे १५०० वे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने व धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  सिरत कमिटीच्या वतिने आयोजित केलेल्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात नाना […]Read More

अर्थ

करसल्लागारांची सरकारकडे आर्त हाक; ITR व टॅक्स ऑडिट रिपोर्टसाठी मुदतवाढीची

पुणे, दि ८: पिंपरी-चिंचवड भाजपा चार्टर्ड अकाउंटंट्स सेल (BJPCA Cell) तर्फे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देऊन आयकर विवरणपत्रे (ITR) आणि टॅक्स ऑडिट रिपोर्ट (TAR) सादर करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढत्या करदात्यांची संख्या, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, तसेच पावसामुळे विस्कळीत झालेले कामकाज या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद […]Read More

ऍग्रो

‘रेशीम विभाग आपल्या दारी’ अभियानातून रेशीम शेतीबाबत मार्गदर्शन…

वाशीम दि ८:– रेशीम संचालनालय, नागपूर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, वाशीम मार्फत यंदा ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ हे विशेष अभियान १ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. संचालक विनय मून यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात होत असून मागील दोन वर्षांपूर्वी नोंदणी करूनही काही कारणास्तव तुती लागवड किंवा रेशीम उद्योग सुरू न केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन […]Read More

राजकीय

वैचारिक सुंता झालेल्या संजय राऊत यांनी छत्रपतींचं नाव घेऊ नये

मुंबई दि ७ — औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते आणि ज्यांची वैचारिक सुंता झाली असे संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये, असा जोरदार हल्ला नवनाथ बन यांनी चढवला आहे. नवनाथ बन म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करूनच केली जाते. डॉ. हेडगेवार […]Read More

राजकीय

बाप्पाच्या विसर्जनानंतर राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का?

मुंबई दि ७ — “गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं आहे का?” असा सवाल भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केला. संजय राऊत आता हवेत बाण चालवू लागले आहेत. देवेंद्रजींच्या जाहिरातीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. खरं तर अशा जाहिराती सर्वसामान्य जनतेच्या प्रेमातून येतात. पण उद्धव ठाकरे आणि राऊत यांचा जनतेशी वा कार्यकर्त्यांशी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या बाप्पाला निरोप

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या बाप्पाला निरोप पुणे, – ढोल-ताशांच्या गजरात आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या जल्लोषात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. बुधवारी (ता. २७) रोजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठापनेनंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात […]Read More