अबुधाबी, दि. ३० : UAE मध्ये राहणाऱ्या अनिल कुमार बोल्ला माधवराव बोल्ला या 29 वर्षीय भारतीय तरुणाने यांनी युएई लॉटरीचा पहिला 100 मिलियन दिरहमचा (Million Dirham) जॅकपॉट जिंकला आहे, ज्याचे भारतीय चलनात अंदाजित मूल्य सुमारे 240 कोटी रुपये आहे. युएई लॉटरीने सोमवारी व्हिडिओ जारी करून अनिल कुमार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आणि त्यांचे अभिनंदन […]Read More
मुंबई, दि. ३० :शेत-रस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची सात दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळपाहणी पंचनामा आणि जिओ – टँग छायाचित्रांच्या आधारे करणे अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्याचा, शेतकरीहिताचा महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली “नागरिकांचे जीवनमान सुकर करणे” […]Read More
मुंबई दि ३० : मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]Read More
मुंबई दि.30 – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता रायगड जिल्हातील महाडच्या क्रांतिभुमीत चांदे मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या 69 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यास […]Read More
महाड दि ३० : (मिलिंद माने)राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दीपोत्सवादरम्यान वीज प्रवाह नसल्याने संपूर्ण रायगड किल्ला अंधाराच्या खाईत लोटला होता . याचे वृत्त जाहीर झाल्यानंतर व त्यातच रायगड किल्ल्यावरील मागील नऊ महिन्यापासून वीज बिल थकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुरातत्व विभागाला जाग आली व […]Read More
मुंबई, दि ३०‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुटी आहे. असे असले तरी, बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुस-या दिवशी म्हणजे गुरुवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात येत आहे...भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता […]Read More
मुंबई दि ३० : पत्रकार आणि लेखणी यांचा संबंध जीवाभावाचा. पूर्वी अनेक जण शाईचे पेन वापरीत असत. अताही काही जण शाईचे पेन वापरतात. परंतु ही लेखणी जमविण्याचा छंद जोपासणारे विरळाच, नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव यांनी हा छंद जोपासला असून गेल्या ३९ वर्षांत त्यांनी तब्बल ९ हजार लेखण्या जमविल्या आहेत. आपण त्यांच्याच शब्दांत वाचू […]Read More
पुणे, दि ३०: कॅन्सर बरे झालेले रुग्ण हे आमच्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आणि हिरो आहे. ते आगामी काळात इतर रुग्णांना प्रेरणा देऊन धैर्य देत रहातील. केअर इंडिया मेडिकल सोसायटी समाजात एक महत्त्वपूर्ण काम करत असून त्यांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी रुग्णांवर केवळ उपचार केले जात नाही तर सेवाभाव पद्धतीने मोफत काम केले जात आहे. माझ्या […]Read More
मुंबई दि. ३०: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील “फिल्म बाजार” विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात येतात. यंदा “फिल्म बाजार – 2025” करिता संकेत माने दिग्दर्शित मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि मिलिंद कवडे दिग्दर्शित श्री गणेशा या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा […]Read More
मुंबई, दि ३०नामदार नाना शंकर शेठ समितीच्या वतीने सौ. पद्मिनिताई विलासराव शंकरशेट यांच्या पुढाकाराने आणि आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखालीमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मंत्रालय येथे भेट घेऊन मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याच्या प्रलंबित विषयास गती मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले. याबाबत आमच्याकडे आपला हा प्रस्ताव गेला अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आपल्या या […]Read More