mmcnews mmcnews

देश विदेश

श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू

श्रीनगर, दि.१५ : दिल्ली पाठोपाठ श्रीनगरही प्रचंड स्फोटाने हादरले आहे. नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल (दि. १४) रात्री जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने तपासताना अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी किमान ५ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मृत आणि जखमींमध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि फॉरेन्सिक टीमच्या […]Read More

राजकीय

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

नोएडा, दि. १५ : प्रख्यात ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना वयाच्या १०० व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण-२०२४’ देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतार यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे हा पुरस्कार नोएडा येथील त्यांच्या घरी जाऊन प्रदान केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये 800 निरोगी व्यक्तींची Heart Surgery

अहमदाबाद, दि. 15 : वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकाराच्या घटना देशभर दिसून येत आहेत. गुजरातमधील प्रमुख शहर अहमदाबाद येथे तब्बल ८०० व्यक्तींना कोणताही त्रास नसूनही त्यांची Heart Surgery झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरज नसताना या लोकांच्या हृदयात स्टेंट टाकले आहेत. गेल्या दीड वर्षात तब्बल 800 शस्त्रक्रियांची नोंद झाली. याच आकड्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला […]Read More

देश विदेश

गाझाचे दोन भागात विभाजन करण्यासाठी अमेरिका सज्ज

अमेरिका गाझा पट्टीचे दोन भागात विभाजन करण्याच्या योजनेवर गाझा पट्टीतील दीर्घकालीन संघर्ष आणि विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका एक नवीन योजना पुढे आणत आहे. या योजनेनुसार गाझाला दोन स्वतंत्र विभागांमध्ये विभागले जाणार आहे – “ग्रीन झोन” आणि “रेड झोन.” ग्रीन झोन हा भाग इस्रायली सैन्य आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली असेल, जिथे पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. […]Read More

पर्यावरण

केदारनाथमध्ये २,३०० टन कचऱ्याचा डोंगर, स्वच्छतेसाठी २५ कोटींचा खर्च

उत्तरकाशी, दि. १५ : उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ मंदिर यंदा यात्रेकरूंनी अक्षरशः गजबजून गेले. बाबा केदारच्या दर्शनासाठी तब्बल १७.६८ लाख भाविकांनी हजेरी लावली. या विक्रमी गर्दीमुळे मंदिर परिसर आणि गौरीकुंड–केदारनाथ मार्गावर २,३०० टन कचऱ्याचा प्रचंड डोंगर जमा झाला आहे. आकडेवारीनुसार, प्रत्येक यात्रेकरू मागे सरासरी १.५ किलो कचरा सोडून गेला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा […]Read More

महानगर

नाताळपासून सुरू होणार नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक उड्डाणे

मुंबई, दि. १५ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (NMIA) २५ डिसेंबर २०२५ पासून व्यावसायिक उड्डाणे सुरू करणार आहे. आकासा एअर दिल्ली ते नवी मुंबई अशी पहिली उड्डाणे चालवेल. दिल्ली आणि कोची २६ डिसेंबरपासून जोडले जातील, तर अहमदाबादची उड्डाणे ३१ डिसेंबरपासून सुरू होतील. कंपनीने सांगितले की ते एनएमआयएमधून चार शहरांना थेट कनेक्शन देईल. दरम्यान, इंडिगो २५ […]Read More

ऍग्रो

सोमवारपासून मुंबईमध्ये बीज महाकुंभ: ‘एशियन सीड काँग्रेस २०२५’

मुंबई दि १५ : यंदाची ‘आशियान सीड काँग्रेस २०२५’ (आशियायी बीज परिषद) सोमवारपासून मुंबईतील रिलायन्स जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू होत आहे. सोमवार, १७ नोव्हेंबर ते शुक्रवार, २१ नोव्हेंबरपर्यंत ही भव्य बीज महापरिषद चालणार आहे. या महापरिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, या कार्यक्रमात देशाचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहून […]Read More

महानगर

भांडुप मध्ये भव्य पुस्तकांचे प्रदर्शन

मुंबई, दि. १५ – ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांचे वडील दिना बामा पाटील यांच्या ९१ व्या जयंती निमित्त दिना बामा पाटील ग्रंथालय, स्टडी सेंटर यांच्यावतिने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार, विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या मुख्य विश्वस्त पल्लवी पाटील, युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांची उपस्थिती होती. […]Read More

राजकीय

काँग्रेस कधीच संपत नसते, पराभव झाला पण काँग्रेस पुन्हा ताकदीने

मुंबई, दि. १५ : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेली टीका निरर्थक आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचाही निवडणुकीत पराभव झाला पण त्यानंतर काँग्रेस पक्ष नव्या जोमाने व ताकदीने उभा राहिला. काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे, त्यामुळे काँग्रेस संपेल, काँग्रेसचे तुकडे पडतील अशा टीकेला काहीही अर्थ […]Read More

राजकीय

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन आता ऑफलाईनसुद्धा

मुंबई, दि. १४ : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी (ता. 15) आणि रविवारी (ता. 16) देखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता […]Read More