मुंबई दि १७ : पालघर जिल्ह्यातील काशीनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली असल्याची माहिती प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते. प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. पालघर […]Read More
विक्रांत पाटील आपल्यापैकी अनेकांसाठी, मांजर हे केवळ एक पाळीव प्राणी नसून कुटुंबातील एक सदस्य असतं. त्यांचं प्रेमळ असणं, खेळकर स्वभाव आणि शांत सोबत आपल्याला आनंद देते. पण, जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या लाडक्या मांजरामुळे एका गंभीर मानसिक आजाराचा धोका वाढू शकतो, तर? विश्वास बसणार नाही, पण अलीकडील संशोधनातून आपले लाडके मांजर आणि मानसिक आरोग्य […]Read More
विक्रांत पाटील त्वचेला झोंबणारे बोचरे वारे आणि हाडं गोठवणारी थंडी… गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र कडाक्याच्या थंडीने अक्षरशः गारठला आहे. सकाळी आणि रात्री तापमानाचा पारा वेगाने खाली घसरल्याने अनेकांना हुडहुडी भरली आहे. पण ही तीव्र लाट अचानक का आली? आणि ती अशा वेळी, जेव्हा हवामान खात्याच्या नोंदीनुसार, मागचेच वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. […]Read More
मुंबई दि. १६ : न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर अत्यंत घाई घाईने व अन्यायकारक कारवाई करण्यात येत आहे या विरोधात आज शिवाजी पार्क परिसरात मुंबई युवक काँग्रेस आणि प्राणीमित्र संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्राणीमित्र संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज शिवाजी पार्क परिसरात भटक्या […]Read More
मुंबई, दि १६काल ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनीगृहनिर्माण व नागरी कामकाजावरील स्थायी समितीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती यात उपस्तिती दर्शवली. या बैठकीस अध्यक्ष खासदार श्री. मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डीजी यांची प्रमुख म्हणून उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी, गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालय, वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा विभाग तसेच इतर मान्यवर यांच्यासोबत […]Read More
छ. संभाजीनगर दि.१६ : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचारात वापर, संशोधन अशा विविध प्रकारे चालना दिली असून येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील सातार तांडा भागातील श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या […]Read More
केतन खेडेकर, दि. १५ : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष – 2025, सहकार महर्षी स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त तसेच फेडरेशनचे मुखपत्र “पतसंस्था परिवार” याच्या रौप्य महोत्सवी विशेष स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळा दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात भव्य उत्साहात संपन्न झाला.सभागृहात नागरी सहकारी पतसंस्था प्रतिनिधींची प्रभावी उपस्थिती होती. फेडरेशन अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांचे प्रभावी प्रास्ताविक फेडरेशनचे अध्यक्ष श्री. […]Read More
मुंबई प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना स्पष्ट केले. या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून लोकसभा निवडणुकीसारखा विजय मिळवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. आज मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय ‘लक्ष्य २०२६’ शिबिराचे […]Read More
बेळगाव, दि. १५ : येथील राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयातील तब्बल 28 काळविटांचा ( संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकच्या वनमंत्र्यांनी दिले आहेत. बेळगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून भूतरामनहट्टी गावात हे प्राणी संग्रहालाय आहे. या प्राणी संहग्रहालयातील 28 काळविंटाचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. […]Read More
अमरावती, दि. १५ : तृतीयपंथीयांचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये उघडकीस आला. अमरावती जिल्ह्यातील तीन तृतीयपंथीयांचं मुस्लिम धर्मांत धर्मांतरण केलं असून एकूण दहाजणांचं धर्मांतर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयात तक्रार आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या संबंधी बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले की, “अमरावतीमध्ये […]Read More