Month: March 2023

गॅलरी

मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली

पुणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे शहरातील पदाधिकारी आणि पुण्यातील राजकीय वर्तुळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली.. Tribute to the Chief Minister ML/KA/PGB29 Mar. […]Read More

महानगर

करमुसे प्रकरणातील आरोपी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

पनवेल, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनंत करमुसे प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा माजी अंगरक्षक वैभव कदम याने आज आत्महत्या केली आहे. १५ दिवसांपूर्वी त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, ठाण्यातील अनंत करमुसे प्रकरणात आरोपी असलेले पोलीस शिपाई वैभव कदम याने बुधवारी सकाळी निळजे ते तळोजा रेल्वे मार्गदरम्यान ट्रेन समोर उडी […]Read More

अर्थ

१ एप्रिल पासून या UPI पेमेंटवर आकारले जाणार शुल्क

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI द्वारे होणाऱ्या व्यापारी व्यवहारांवर आता शुल्क आकारले जाणार आहे.. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच एक परिपत्रक जारी केले आहे ज्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू करण्यास सांगितले आहे. परिपत्रकानुसार २,००० रुपयांपेक्षा जास्तीच्या UPI व्यवहारांवर १.१ टक्के […]Read More

ट्रेण्डिंग

‘ यामुळे ‘ आता राहुल गांधींच्या ही आशा झाल्या पल्लवीत

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी या नावाची बदनामी केल्यामुळे मानहानीचा गुन्हा दाखल झालेल्या राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची सजा सुनावली. याची दखल घेत लोकसभेने त्यांचे सदस्यत्त रद्द केले. त्यामुळे कॉग्रेससह देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता लोकसभेने अन्य एका गुन्हा दाखल झालेल्या लोकसभा सदस्याला […]Read More

कोकण

उद्या मुंबई गोवा मार्ग काँक्रीटीकरण प्रारंभ गडकरींच्या हस्ते

अलिबाग,दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू यांच्यासह आणखी दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण शुभारंभ होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्याही काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 […]Read More

राजकीय

अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यास मोदी सरकार का घाबरते?

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची आहे? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अदानी घोटाळ्याचे ‘दूध का दूध व पाणी का पाणी’, करायचे असेल तर संयुक्त […]Read More

महानगर

८ वे आंबेडकरी साहित्य संमेलन मुंबईत

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकास प्रबोधिनी, मुंबई आयोजित ८ वे आंबेडकरी साहित्य संमेलन रविवार ०२ एप्रिल रोजी सम्राटकार बबनराव कांबळे साहित्य नगरी, शिवाई विद्यालय भांडुप (पूर्व) येथे संपन्न होत आहे. या संमेलनाला सुप्रसिध्द साहित्यिका आयु. आशालता कांबळे या संमेलनाध्यक्षा म्हणून लाभलेल्या आहेत. संमेलनाचे उद्घाटन सद्धम्म पत्रिकेचे संस्थापक संपादक प्रा. आनंद देवडेकर करतील, […]Read More

महानगर

मुंबई सोबत ठाण्यातही 15 टक्के पाणी कपात

ठाणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला गळती निर्माण झाली असून या जलबोगद्याच्या दुरूस्तीचे काम 31 मार्च पासून हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कारणास्तव बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 31 मार्च पासून पुढील 30 दिवस 15% पाणी कपात लागू राहणार आहे. परिणामी ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा […]Read More

गॅलरी

ऑस्ट्रेलियन गायकांनी गायली सुमधुर मराठी भजने

यवतमाळ, दि.२९, (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ येथील सहज योग ध्यान केंद्रातर्फे एका भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियातील कलावंतांनी चक्क मराठीमध्ये सुमधुर भजने गाऊन सर्वांना एक सुखद धक्का दिला.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती दर्शवली. ML/KA/SL 29 March 2023Read More

विदर्भ

ई-ऑफिस प्रणाली तालुकास्तरावर राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा

वर्धा, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासोबत शासकीय कामकाज अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासाठी राज्यात ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय कार्यालयात ही प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर आर्वी उपविभागातील तालुक्यांमध्ये […]Read More