कोल्हापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून सुरू असलेला विसर्ग मध्ये वाढ करण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता 4000 घनफूट प्रतिसेकंद (क्यूसेक्स) पाणी सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे. आवशकयतेनुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविणेत येणार […]Read More
नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. गेल्या चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार सुरू असल्याने या परिसरातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर, दारणा, वैतरणा, भावली, नांदूर मधमेश्वर […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोल्हापुरी चिकन ही एक समृद्ध आणि चवदार मसालेदार चिकन करी आहे जी भारतातील महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराची आहे. ठळक आणि सुगंधी मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या, या डिशमध्ये चवीने भरलेल्या अग्निमय लाल ग्रेव्हीमध्ये शिजवलेले चिकनचे कोमल तुकडे आहेत. कोल्हापुरी चिकन हे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थातील एक प्रमुख पदार्थ आहे आणि बऱ्याचदा भात किंवा चपाती […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रभादेवी येथे असलेले श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण प्रार्थनास्थळे आहेत. हे मंदिर प्रथम गुरुवार 19 नोव्हेंबर 1801 रोजी अभिषेक करण्यात आले होते, ही वस्तुस्थिती सरकारी नोंदींमध्ये नोंद आहे. मंदिर तेव्हा अडीच फूट रुंद असलेल्या श्री सिद्धिविनायकाची काळ्या पाषाणाची मूर्ती असलेली एक छोटी रचना होती. या […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या २४ तासांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात सर्वत्रच पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसामुळे धरणे पूर्ण भरल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे मुळा-मुठा नदी काठच्या घरांमध्ये आणि […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील लाखो स्थलांतरीतांना रोजगार देणाऱ्या महानगरी मुंबईमध्ये खासगी आस्थापनांमध्ये मराठी व्यक्तींना रोजगाराच्या संधी नाकारल्या जात असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहेत. आज यामध्ये अजून एका घटनेची भर पडली आहे. अंधेरीतील मरोळ येथील आर्या गोल्ड नावाची ही कंपनी आहे. डायमंड फॅक्टरीत प्रोडक्शन मॅनेजर पदासाठी जागा रिक्त आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती भवनात भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटावं या हेतूनं ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ या दोन प्रतिष्ठित सभागृहांची नावं बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यानुसार दरबार हॉलचं नामांतर ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोक हॉलचं नामांतर ‘अशोक मंडप’ असं करण्यात आलं आहे. ‘राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतींचं कार्यालय आणि निवासस्थान […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांनी सुट्टी देण्यात आली आहे. IMD ने अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या १० वी आणि १२ वी च्या पुरवणी परीक्षाही आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार […]Read More
बिजिंग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश अशी ख्याती असलेल्या चीनचा जन्मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्या मात्र वाढत आहे.त्यामुळे देशात काम करणार्यांची संख्या कमी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवून ७० वर्ष केले जाणार आहे. चीनमध्ये पुरुष ६० व्या वर्षी आणि महिला ५५ […]Read More
मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई बाहेर उपनगरात राहावयास गेलेले आहेत.त्यांना अकस्मित आजाराची बाधा झाल्यास घराजवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. मात्र त्यानंतर त्याने आपल्या खात्याकडे वैद्यकीय आर्थिक मदतीस औषध उपचाराचा खर्च मागितल्यास महानगरपालिका देत नव्हती.त्यामुळे अनेक आर्थिक संकटाना कामगार,कर्मचा-यांना तोंड द्यावे लागत होते.मात्र म्युनिसिपल मजदूर […]Read More