mmcnews mmcnews

पर्यटन

मुंबई गोवा महामार्गासाठी, होम हवनाचा कार्यक्रम

महाड, दि. २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गाला लागलेली वाईट नजर उतरवण्यासाठी , हा महामार्ग लवकर होण्याचे गाऱ्हाणे घालण्यासाठी माणगाव एस. टी. बस स्थानकासमोर होम हवनचा कार्यक्रम करण्यात आला. गेल्या १३ वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे संथगतीने काम सुरू असून कोकणातील प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत असून एखादा अपघात […]Read More

शिक्षण

डॉ.स्नेहलता देशमुख कालवश

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ख्यातनाम शल्यविशारद, शिक्षणतज्ज्ञ तसेच मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ स्नेहलता देशमुख यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी आज देहावसान झाले. बालरोगतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य केलं आहे. त्या मुंबई , शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्या होत्या. […]Read More

राजकीय

मराठवाड्याचा दुष्काळ, दूध, कापूस, सोयाबीन, कांद्याचा मुद्दा नीती आयोगाच्या बैठकीत…

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळविणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणे या महत्वाच्या विषयांसह दूध, कापूस, सोयाबीन, कांदा यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील निती आयोगाच्या बैठकीत बोलतांना केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या नवव्या नियामक […]Read More

मनोरंजन

सखी-सुव्रत ही जोडी लवकरच दिसणार नवीन नाटकात

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल, दोस्ती, दुनियादारी या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी स्टारकास्ट म्हणजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी. अमर फोटो स्टुडिओ या नाटकामध्ये देखील त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही एककांचे जीवनसाथी असणारी सखी आणि सुव्रत ही जोडी आता एक नवी नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हल्लीची पिढी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‘वाघनखे खरी असल्याची खात्री नाही’ सातार्‍याच्या म्युझियमकडून स्पष्ट सूचना

सातारा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून काही दिवसांसाठी भारतात आणण्यात आलेली ही वाघनखे शिवाजी महाराजांनी विजापूरचा सुलतान अफजल खान याचा कोथळा काढण्यासाठी वापरलेली वाघनखे आहेत, असा दावा सुरुवातीला राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत होता. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती […]Read More

देश विदेश

भारताच्या परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ

मुंबई,दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे देशाच्या परकीय चलन साठ्यात सातत्याने विक्रमी वाढ होत आहे. RBI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 19 जुलै 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात पुन्हा 4.003 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आता हा साठा 670.857 अब्ज डॉलर झाला आहे. यासह परकीय चलनाचा साठा […]Read More

ट्रेण्डिंग

लाखोंचा कर थकवल्याने खेडकर कुटुंबियांच्या मालकीच्या कंपनीचा होणार लिलाव

पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खोट्या कागदपत्रांच्या आधारे विविध सवलती मिळवत UPSC ची फसवणूक करणारी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरचा विषय देशभर गाजतो आहे. त्यातच तिचे वडिल दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त कृतीही आता समोर येत आहे. संपूर्ण कुटुंबच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना पुणे पोलीसांनी मनोरमा खेडकर यांना अटक […]Read More

देश विदेश

Paris Olympic – मनू भाकर 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम

पॅरिस, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्या होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिच्याकडून सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. मनूने पात्रता स्पर्धेत 600 पैकी 580 गुण मिळवले आणि 45 नेमबाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत दुसरा भारतीय नेमबाज […]Read More

महानगर

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद या पदाच्या पंचवार्षिक कारकीर्दीचा अहवाल राज्यपालांना सादर केला. यामध्ये विविध विषयांचे अनुषंगाने घेतलेल्या बैठका, विधान परिषदेतील निर्देश,पास करण्यात आलेले कायदे […]Read More

ट्रेण्डिंग

यवतमाळ जिल्ह्यातील 6 प्रकल्प 100 टक्के भरले

यवतमाळ, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहराला पाणीपुरवठा करणारे दोन्ही प्रकल्प तुडुंब भरले असून गेल्या सहा दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात संतोषजनक पाऊस पडत आहे. परिणामी जिल्ह्यातील सहा प्रकल्प 100% भरले असून त्यामध्ये गोखी, वाघाडी, सायखेडा ,नवरगाव, चापडोह, आणि निळोणा या प्रकल्पाचा समावेश आहे. यापैकी यवतमाळ शहराला चापडोह आणि निळोणा या धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान […]Read More