मुंबई, दि. ६ : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीत सावधगिरीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने उद्या देशभरात विविध ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांची 3 गटांत विभागणी करण्यात आली आहे. १ ला गट : अतिसंवेदनशील ठिकाणे .यात मुंबईसह लगतच्या उरण व तारापूर या 2 ठिकाणांचा […]Read More
मुंबई, दि. ५सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील बहुतांश तिकीट काउंटर फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे रोख रकमेने तिकीट खरेदीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणीचा त्रास सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्थानकात रोख रक्कम देऊन तिकीट खरेदी करता येईल यासाठी काउंटर सेवा सुरू करा, अशी मागणी युवासेनेने मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे केली आहे.सगळ्या सगळीकडे डिजिटल […]Read More
मुंबई दि ६ — तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असून, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक […]Read More
पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानकडे जाणारे चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. भारताने बगलीहार धरणातून चिनाब नदीचे पाणी थांबवल्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या जलपुरवठ्यावर दिसू लागला असून सियालकोटमध्ये चिनाब नदीची पाण्याची पातळी सोमवारी १५ फूटांपर्यंत खाली गेली, जी मागील दिवसाच्या तुलनेत ७ फूटांनी कमी आहे. पंजाबमधील २४ महत्त्वाच्या […]Read More
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने २०२५ च्या मेट गालामध्ये Met Gala 2025 in भव्य पदार्पण केले आणि आपल्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधले. न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे झालेल्या या प्रतिष्ठित फॅशन फंडरेझिंग गालामध्ये शाहरूख प्रसिद्ध भारतीय डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केलेल्या खास ऑल-ब्लॅक पोशाखात झळकला. या वर्षीच्या मेट गालाची थीम “Superfine: Tailoring Black […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ : केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्या ( 7 मे ) रोजी मॉक ड्रिल (Mock Drill) घेण्याचे आदेश दिले आहेत. पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने युद्धजन्य स्थितीनिर्माण झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे.राज्यांनी पोलिस, नागरी […]Read More
बीड/ चंद्रपूर दि ६– बीड जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.आष्टी तालुक्यातील कारखेल, डोईठाण, बेलगाव, चिंचाळा या गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कांदा, आंबा इतर फळबागांचे मोठे नुकसान केले आहे.कारखेल बुद्रुक यासह आष्टी तालुक्यात तब्बल दोन तास अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान मोठी गारपीट देखील झाली. […]Read More
मुंबई, दि.५ :– अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जन्मस्थळी मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. त्यामध्ये राज्यातील एकल आणि परित्यक्ता महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करण्याची मागणी केली […]Read More
मुंबई, दि.5कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्या वतीने 1 मे, कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणाऱ्या 11 इमारतींना11 गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत. गिरण्या बंद पडल्या आणि गिरणी कामगार देशोधडीला लागला. मुंबईतील गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकला गेला. गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. आणि गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. […]Read More
पुणे, दि. ५ :– पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार देण्याऐवजी, त्यांना जो मोबदला अपेक्षित आहे, त्यासह आपण आपल्या मागण्या सरकारकडे सात दिवसांत मांडण्याचे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते म्हणाले, कोणत्याही स्वरूपाचा अन्याय सरकार शेतकऱ्यांवर करणार नाही. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना तसेच, भागातील तरुणांचे हाताला काम मिळेल.”पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र […]Read More