mmcnews mmcnews

बिझनेस

तृतीयपंथी चालविणारे राज्यातील पहिलं शेळीपालन केंद्र चितळी येथे

अहिल्यानगर दि १५– समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहाता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथीयांच्यावतीने चालविण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे, अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव […]Read More

शिक्षण

वरळीच्या विद्यार्थिनीने मिळवला मुंबईतून सर्वप्रथम येण्याचा मान !

मुंबई, दि 15लोअर परळच्या ‘लक्ष्य ॲकेडमीची‘ विद्यार्थिनी कु. अक्षरा वर्मा हिने दहावी – २०२५ परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून ९७.०० % गुणांसह सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी तिच्या घरी जाऊन आमदार सुनिल शिंदे यांनी तिची व कुटुंबीयांची भेट घेतली व तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक […]Read More

महानगर

‘एमसीएमसीआर’ येथील विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई, दि 15नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसेच महानगरपालिकांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एमसीएमसीआर’ या संस्थेला समन्वय (नोडल एजन्सी) म्हणून मान्यता दिली आहे. पवई स्थित महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर) येथे कंत्राटी तत्वावर काही शैक्षणिक, आस्थापना तसेच तांत्रिक संवर्गातील […]Read More

पर्यावरण

मुंबईतील C&D कचरा व्यवस्थापन – स्वच्छ आणि शाश्वत भविष्याकडे वाटचाल

मुंबई दि १५– मुंबई ही देशातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या महानगरांपैकी एक आहे. इथे सातत्याने नवीन इमारती उभारल्या जातात, रस्ते रुंदीकरण आणि विविध विकास प्रकल्प राबवले जातात. परिणामी, मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि पाडकामाचा (Construction and Demolition. ie. C&D) कचरा निर्माण होतो. सध्या, मुंबईत रोज अंदाजे 8,500 मेट्रिक टन C&D कचरा निर्माण करते. या कचऱ्याच्या योग्य […]Read More

विदर्भ

यवतमाळ- वाशीम मध्ये अवकाळी पावसाची हजेरी

यवतमाळ वाशीम दि. १५– यवतमाळ शहर उन्हाच्या कडाक्यात तापत असताना, आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून लोकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. वाशीम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून बेलोरा विठोली परिसरात मुसळधार सरी कोसळल्या. वाशीम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, मानोरा तालुक्यातील बेलोरा विठोली […]Read More

कोकण

अवकाळी पावसाने विजांचा कडकडाटासह पोलादपूर, महाड तालुक्याला झोडपले.

महाड दि १५ — रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यांत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस दुपारी हजेरी लावत असून बुधवारी पुन्हा पोलादपूर तालुक्याचा अवकाळीने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर बाजीरे गावच्या हद्दीमध्ये रस्त्यावर डोंगरावरील माती आल्यामुळे मोटरसायकल स्वार चालक, चारचाकी वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा […]Read More

विदर्भ

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रथमच आढळली उडणारी खार

चंद्रपूर दि १५– जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशात १७६ मचाणांवरून वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी कोळसा रेंजमध्ये प्रथमच उडणारी खार आढळून आली. यामुळे वन्यजीवप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध पशु-पक्ष्यांसह प्रथमच उडणारी खार आढळून आली. या खारीचे शरीर सडपातळ आणि पाय लांब असतात. काही जातींमध्ये शेपटी वरून खाली चपटी […]Read More

राजकीय

‘गवई’ न्यायदानात सर्वोच्च ‘भूषण’ ठरावेत !

योगेश वसंत त्रिवेदीभारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या नांवाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केली असून ते मे २०२५ मध्ये सरन्यायाधीश पदी विराजमान होत आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतीशय आनंदाची, प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची बाब आहे. न्या. भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती, रिपब्लिकन […]Read More

ट्रेण्डिंग

गोल्डन बॉय नीरज चोप्रा झाला लेफ्टनंट कर्नल

नवी दिल्ली, दि. १४ : गोल्डन बॉय ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा आता भारतीय सैन्य दलाचा भाग होणार आहे. नीरज चोप्राला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदाचा बहुमान देण्यात आला आहे. नीरज चोप्राने भाला फेंक प्रकारात उत्तुंग कामगिरी करत जगभरात तिरंगा फडकवला होता. आता, त्याला सैन्य दलाची वर्दी मिळणार आहे. भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन 1948 च्या Para-31 […]Read More

देश विदेश

Defense Stocks मध्ये १७% वाढ

मुंबई, दि. १४ : भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान भारतीय संरक्षण साठ्यात वाढ होत आहे. आज (१४ मे ) कोचीन शिपयार्ड, गार्डन रीच शिपबिल्डर्स (GRSE) आणि माझगाव डॉक सारख्या कंपन्यांचे शेअर्स १७% पर्यंत वाढले. तर निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्समध्ये ३% वाढ झाली. सरकारी ऑर्डरमध्ये वाढ, देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे आणि निर्यातीत वाढ यामुळे संरक्षण साठ्यांमध्ये सतत गुंतवणूक […]Read More