mmcnews mmcnews

देश विदेश

आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याबाबतच होईल

नवी दिल्ली, दि. १५ : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाक विरोधात भारताने हाती घेतलेले Operation Sindoor आता पाकला चांगला धडा शिकवल्यावर थांबवण्यात आले आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण भारत- पाकमध्ये मध्यस्थी करून समेट घडवल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा भारताकडून वारंवार फेटाळण्यात येऊनही ट्रम्प याचे श्रेय घेऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री […]Read More

महिला

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सांची धनसरे ने मिळवले यश

मुंबई दि १५– चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील सांची अनंत धनसरे ही आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थीनीने १० वी मध्ये ९५ . ४० टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरी आली आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून गरीबीतून घवघवीत यश मिळवल्याने सांचीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सिध्दार्थ कॉलनी येथील छोट्याशा घरात राहणाऱ्या सांचीची आई स्वाती गृहिणी असून वडील अनंत एका छोट्या दैनिकात […]Read More

मनोरंजन

मिस्टर परफेक्शनिस्ट करतोय दादासाहेब फाळकेंवर चित्रपट

मुंबई, दि. १५ : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या अभुतपूर्व कार्याबाबत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि राजकुमार हिरानी चित्रपट बनवण्याची तयारी करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. आमिर खान त्याचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच या नवीन चित्रपटातील भूमिकेची तयारी सुरू करेल. लॉस एंजेलिस (एलए) मधील व्हीएफएक्स […]Read More

राजकीय

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या

मुंबई, दि 15पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार होतेयं याचा मला अतिशय आनंद होत आहे. अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून भ्रष्टाचारमुक्त धोरण राबविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय भविष्यातही कायम राहील. गाव पातळीवर कष्ट करणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या […]Read More

ट्रेण्डिंग

पाकिस्तानच्या 5,033 भिकाऱ्यांची सौदी अरबमधुन हकालपट्टी

इस्लामाबाद, दि. १५ : सातत्यपूर्ण अशांततेमुळे अस्थिर झालेला पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला आहे. यामुळे सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. यामुळेच गरिबीने त्रस्त झालेले काही लोक अन्य देशाचा रस्ता धरुन तिथे भिक मागण्याचे काम करत आहे. जगभरातील देश आता पाकिस्तानी भिकाऱ्यांमुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या जवळपास दीड वर्षांमध्ये सौदी अरबने असे 5,033 पाकिस्तानी […]Read More

ट्रेण्डिंग

Operation Black Forest अंतर्गत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली, दि. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवाद्यांच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील कर्रगुट्टलू डोंगरात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत मोठे यश […]Read More

राजकीय

जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा

मुंबई, दि. १५ —ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी या तत्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र […]Read More

राजकीय

उद्या वसंत व्याख्यानमालेत या नेत्याची तोफ धडाडणार.

मुंबई, दि 15महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. छगन भुजबळ यांची तोफ उद्या दि. 16 मे रोजी सायं. 7:15 वाजता वसंत व्याख्यानमालेत धडाडणार आहे.देवमामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट नाशिक येथे स्व. वसंतराव नेवासकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे 16वे पुष्प गुंफणार आहेत. ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे.नुकताच सर्वोच्च न्यायालयाने […]Read More

महाराष्ट्र

वीज कंत्राटी कामगार कायम होण्याच्या प्रतिक्षेत

मुंबई, दि 152012 साली महावितरण कंपनीत 7000 विद्युत सहाय्यक पदाची भरती निघाली होती. या भरती मध्ये सर्व कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना त्याच पदावर सेवेत कायम करून घ्यावे अशी 5656/2012 याचिका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मा.मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. राज्यभरातील 1362 कामगार यात समाविष्ट आहेत.मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही केस 13 […]Read More

पर्यटन

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ” स्मार्ट बस “

मुंबई दि १५– भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ” स्मार्ट बसेस ” घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या ३ हजार बसेस खरेदी च्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला […]Read More