mmcnews mmcnews

विदर्भ

अवकाळी पावसाचा तडाखा,संत्रा बागांना नुकसान..

अमरावती दि १६– अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील ऊसळगव्हाण येथे शेतात उभा असलेला बीएसएनएल टॉवर वादळी वाऱ्याने जमिनीवर कोसळला. यात टॉवरचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच उन्हाळी हंगामात असलेल्या भुईमूग,संत्रा पिकाला देखील मोठा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मात्र या पावसामुळे तापमानात घट […]Read More

गॅलरी

राज्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने समिती करणार आंदोलन

मुंबई, दि 16राज्यात माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीच्यावतिने मंगळवार दि. २० मे, २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पुर्व), मुंबई येथिल महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष व जेष्ठ कामगार […]Read More

करिअर

नायर दंत रुग्णालय व दंत महाविद्यालयात पदवी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

मुंबई, दि 16बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित नायर दंत रुग्णालय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयात दैनंदिन वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, अधिकाधिक दर्जेदार सेवा देणे आगामी काळात शक्य होणार आहे. रुग्णालयात अधिक क्षमतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याकरिता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय दंत वैद्यकीय परिषद (डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया) यांनी मान्यता […]Read More

राजकीय

विरोधकांकडूनही आमदार योगेश कदम यांच्या कामाचे कौतुक

रत्नागिरी दि. १६ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल टाकेडे येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशन संचालित ‘मिलन’ वृद्धाश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले काँग्रेस नेते भाई जगताप यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीचे सार्वजनिकरित्या कौतुक करत सकारात्मक राजकारणाचा आदर्श घालून दिला. “या मतदारसंघाचे नेतृत्व रामदासभाई कदम यांनी केलं. आता त्यांचे चिरंजीव योगेश […]Read More

देश विदेश

खेलो इंडियात महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक

पाटना दि १५:– गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकाचा पराक्रम केला. ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले. तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही महाराष्ट्राने यंदाच्या ७व्या खेलो इंडिया स्पर्धेत केला आहे. पाटलीपुत्र क्रीडा संकुलातील समारोप समारंभात बिहारचे […]Read More

राजकीय

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशनिंग

मुंबई दि. १५ :– भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करावे. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध होईल अशाप्रकारे १५ मागण्यांबाबतचे निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले.भटके विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हे […]Read More

महानगर

वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्याकडे इ डी ला सापडले घबाड

वसई दि १५– अंमलबजावणी संचालनालय (ईडी), मुंबई विभागीय कार्यालय-II ने १४.०५.२०२५ आणि १५.०५.२०२५ रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार मुंबई आणि हैदराबादमधील १३ वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहिमा राबवल्या. या शोध मोहिमेत अंदाजे ९.०४ कोटी रुपये रोख आणि २३.२५ कोटी रुपये किमतीचे हिरे जडवलेले दागिने आणि सोने आणि मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे जप्त […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा ठाण्यात जनता दरबार

मुंबई, दि 15:ठाणे शहरात भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या जनता दरबारवरून राजकारण रंगले असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाण्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे.बुधवारी अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासनकेले आहे. या जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती […]Read More

ट्रेण्डिंग

मान्सून अरबी समुद्रात दाखल

भारताच्या हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या अरबी समुद्रात प्रवेशाची केल्याची माहिती दिली आहे . यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पुढे सरकत असून तो आंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आधीच पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत तो मालदीव आणि मध्य बंगालच्या उपसागरातही प्रवेश करेल अशी शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनामुळे वातावरणात ढगाळ स्थिती निर्माण झाली असून तापमानात घट दिसून […]Read More

राजकीय

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची ओळख पटवण्यासाठी शिवसेनेने अतिरिक्त बक्षीस जाहीर

मुंबई, दि 15दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेत, श्री एकनाथ जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटवण्यासाठी माहिती देणाऱ्यांना 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी तीन संशयितांचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर, ज्यासाठी त्यांनी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, त्याला प्रतिसाद म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे.“आम्ही […]Read More