mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

भंडारदरा धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

अहिल्यानगर दि. ७ — जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने आदिवासी जन जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच भागातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भागात भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. थंडी वाऱ्यामुळे जनावरेही गारठली आहेत. असाच पाऊस पडत राहिला तर जनावरही दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर […]Read More

राजकीय

भरतीप्रक्रियेत सुधारणा करून सरकारकडून मेगाभरती….

मुंबई दि ७ — राज्य सरकारने सत्तर हजार जागांची भरती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखांच्या वर पोहोचली आहे. आता १५० दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागांना आकृतीबंध सुधारून, भरतीसेवा नियम नव्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ते होताच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील […]Read More

राजकीय

बोगस अंगणवाडी सेविका, दोन अधिकारी निलंबित…

मुंबई दि ७ — नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असणाऱ्या अंगणवाडीत प्रत्यक्ष नियुक्त सेविकेऐवजी तिच्या नातेवाईक स्त्री ने खोटी कागदपत्रे सादर करून मूळ सेविकेचा पगार हडप केल्याप्रकरणी विधानसभेत मंत्री आणि सत्तारूढ सदस्यांमध्ये जोरदार चकमक उडाली अखेर दोन अधिकारी निलंबित करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली. या प्रकरणी चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९९६ […]Read More

महानगर

धामणी धरणाचे पाच ही दरवाजे उघडले, सूर्या नदीत विसर्ग सुरू

पालघर दि ६:– पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. सध्या जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली असून सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाच ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास या धरणांमधून सूर्या नदीत चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग […]Read More

राजकीय

मतदारयाद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

मुंबई, दि. ६ —विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री […]Read More

महानगर

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो”

मुंबई, दि. ६ :– देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, […]Read More

ट्रेण्डिंग

विठुरायाच्या कृपेने संकल्प सिद्धी – डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून आभार

पुणे दि ६ – पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या व राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. या दिवशी त्यांनी पांडुरंगाच्या चरणी देश व राज्यासाठी केलेल्या मागील वर्षीच्या संकल्पाच्या सिद्धतेबद्दल विठ्ठल-रुक्मिणी मातेस कृतज्ञता व्यक्त केली. या धार्मिक विधींमध्ये डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत ज्येष्ठ […]Read More

ट्रेण्डिंग

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न”

सोलापूर दि ६ — देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे, हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण […]Read More

ट्रेण्डिंग

आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत भक्तांसाठी लाडू वाटप

मुंबई,दि ६आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने बाळाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि धगधगती मुंबई परिवार यांच्या वतीने समाजसेवेचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. कोपरखैरणे येथील चिकनेश्वर मंदिर (तीन टाकी बस डेपो मागे), तसेच धारावीतील खांबदेव नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात हे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात हजारो भाविक भक्तांना राजगिरा लाडू, केळी व तुळशीचे रोप यांचे वाटप […]Read More

ट्रेण्डिंग

मुळशीत एक एकर शेतात साकारले 200 फूट ज्ञानोबा माऊली

पुणे दि ६ — आषाढी वारी निमित्त मुळशी तालुक्यातील वातुंडे गावात नाचणीच्या पिकामधून तब्बल 200 फूट संत ज्ञानेश्वर महाराज साकार झाले आहेत.महादेव राघू शिंदे व नामदेव राघू शिंदे यांच्या शेतात हे चित्र उगवले आहे. स्वरा लक्ष्मी बाळकृष्ण शिंदे हिच्या संकल्पनेतून ४० गुंठे शेतात २०० फूट बाय १५० फूटाचे हरित चित्र साकार झाले आहे. २१ दिवसात […]Read More