mmcnews mmcnews

ऍग्रो

राज्यातील सुमारे पावणे दोन लाख शेतमजुरांना विमासंरक्षण…

मुंबई दि १० — राज्यातील एक कोटी पंचाहत्तर लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांत सर्वात जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर तीन वर्षात सत्तर हजार कोटींची रक्कम खर्च करण्यात आली आहे अशी माहिती कृषि राज्यमंत्री […]Read More

राजकीय

घरांच्या नोंदणी करण्यासाठी महाआवास नावाने नवे ऍप…

मुंबई दि १० — प्रधानमंत्री आवास योजनेसह सर्व घर योजनांसाठी नोंदणी करण्यासाठी महाआवास नावाने अँप येत्या तीन महिन्यात विकसित करण्यात येत आहे, त्यावर नोंदणी करण्यात आलेल्या घरांची लॉटरी दर आठवड्यात काढण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना देवयानी फरांदे उपस्थित केली होती, त्यावर प्रवीण दटके यांनी उपप्रश्न विचारले. नाशिक […]Read More

गॅलरी

आटपाडीतील जमीन हडपप्रकरणी मुंबईत आझाद मैदानात विधवेचे आंदोलन.

मुंबई, दि १०विधवा महिला लाभार्थी पेन्शन सुरु करुन देतो असे आमिष दाखवून खरेदी पत्रावर अंगठ्याचे ठसे उमटून फसवणूक करुन सुमारे १७ एकर शेतजमीन हडपल्याने सांगली जिल्हयातील पडळकरवाडी (ता. आटपाडी) येथील वृद्धा विठाबाई बापू पडळकर (वय ८२) यांनी कुंटूबायासमवेत आझाद मैदानात शुक्रवारपासून आंदोलन सुरु केले आहे. विठाबाई पडळकर म्हणाल्या, विधवा पेन्शन सुरु करुन देतो असे आमिष […]Read More

राजकीय

गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव

मुंबई, दि. १०–100 वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, […]Read More

गॅलरी

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हे माझे परम कर्तव्य

मुंबई, दि १०विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हे माझे परम कर्तव्य असून विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी विशेष मेहनत करावी आणि आपले ध्येय गाठावे असे जाहीर प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले.ही केवळ यशाची दखल नव्हे, तर पुढील वाटचालीसाठी दिलेली नवी ऊर्जा आहे. […]Read More

महानगर

खाजगीकरणा विरोधात म.न.पा. कामगार आंदोलनास उद्धव ठाकरेंचा पाठींबा !

मुंबई प्रतिनिधीबृहन्मुंबई महानगरपालिकेतील २२ विभागामध्ये एरीया बेस्ड नावाखाली सध्या कार्यरत असलेल्या कायम आणि कंत्राटी कामगार अशा १५ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येत असल्यामुळे म.न.पा. मध्ये कार्यरत असलेल्या सर्व संघटना एकत्र येऊन संघर्ष समितीमार्फत तीव्र आंदोलन करणार आहेत. या संदर्भात अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदन देण्यात आलेली आहेत. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उध्दव […]Read More

गॅलरी

मुंबई पुणे एक्सप्रेसवर एसटी बसचा अपघात, हाजी अराफत शेख यांची

पुणे, दि १० :पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा एक्झिट पॉइंटच्या पुढे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आज पहाटे हिरकणी एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात बसमधील चालक अडकून पडले होते व अनेक प्रवासी भयभीत अवस्थेत अडकलेले होते. अपघाताच्या काही वेळातच भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचा ताफा त्या […]Read More

विदर्भ

ब्रह्मपुरी तालुक्यातील 33 गावांना पुराच्या वेढा, 23 गावांचे मार्ग झाले

चंद्रपूर दि १०:— तीन दिवस बरसलेला संततधार पाऊस आणि गोसे खुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचे पाणी शिवारात शिरल्याने नाले दुथडी भरून वाहत आहेत. काल ब्रह्मपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील ३३ गावांना पुराने वेढा घातला. संततधार पावसाने नऊ गावांतील ३० घरे व अनेक गोठ्यांची पडझड झाली. झळ सुरू असल्याने पूर आणखी वाढू […]Read More

शिक्षण

विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मिळाले यश

मुंबई, दि. ९ : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढत भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज सरकारनचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट दिली आणि सरकारतर्फे सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा केली. तसेच अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पैसे जमा होतील, असे […]Read More

मनोरंजन

प्रिया बापट- उमेश कामत १२ वर्षांनी दिसणार एका चित्रपटात

मुंबई, दि. ९ : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत हे तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर येत आहेत.गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या […]Read More