mmcnews mmcnews

देश विदेश

प्रहार – नवीन राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जाहीर

नवी दिल्ली, दि. २४ : देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे धोरण जाहीर केले आहे. गृह मंत्रालयाने देशाचे नवीन राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण आणि रणनीती जाहीर केली असून, याला ‘प्रहार’ (PRAHAAR) असे नाव देण्यात आले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये दहशतवादाचे स्वरूपही बदलत असून, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हे व्यापक धोरण तयार करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

केरळ राज्याचे नाव आता बदलणार

थिरुवनंतपुरम, दि. २४ : केरळ राज्याचे नाव आता लवकरच बदलणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून केरळ राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने, आज ‘केरळ’ या राज्याच्या नावात बदल करून ते ‘केरलम ’ असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती ‘केरळ (आल्टेरेशन ऑफ नेम ) बिल , 2026’ हे विधेयक […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी बंधनकारक

गांधीनगर, दि. २३ : गुजरात सरकारने विवाह नोंदणीसंदर्भात महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. या नव्या नियमांनुसार प्रेमविवाहासाठी आई-वडिलांना अनिवार्यपणे माहिती देणे बंधनकारक ठरणार आहे. म्हणजेच, आता गुपचूप किंवा घरच्यांना न सांगता लग्न करणे कठीण होणार आहे. विवाह नोंदणीपूर्वी पालकांना नोटीस पाठवली जाईल आणि त्यांची संमती घेणे आवश्यक ठरेल. या निर्णयामागे सरकारचे म्हणणे आहे की अशा […]Read More

मनोरंजन

धर्मेंद्रचा अखेरचा चित्रपट OTT वर

मुंबई, दि. 23 : दिवंगत अभिनेते धर्मेद्र यांचा अखेरचा चित्रपट इक्कीस 26 फेब्रुवारीला Prime Video वर दाखल होत आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा युद्धपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1971 च्या बसंतरच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर कथा उलगडते. चित्रपटात युद्धदृश्यांबरोबरच वडील ब्रिगेडियर मदन लाल खेतरपाल आणि पाकिस्तानातील ब्रिगेडियर जान मोहम्मद निसार यांच्यातील भावनिक […]Read More

ट्रेण्डिंग

युजर्सच्या संमतीशिवाय डेटा शेअरिंग नाही – न्यायालयाच्या आदेशाने वरमले WhatsApp

नवी दिल्ली, दि. २३ : देशातील कोट्यवधी WhatsApp युजर्ससाठी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्यानंतर आता स्पर्धा आयोगाने (CCI) दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यास WhatsApp सहमती दर्शवली आहे. म्हणजेच, आता युजर्सना त्यांचा वैयक्तिक डेटा इतर मेटा (Meta) प्लॅटफॉर्म (इंस्टाग्राम, फेसबुक) वर शेअर करायचा की नाही याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. WhatsApp आणि मेटा Meta यापूर्वी या आदेशाविरोधात […]Read More

ट्रेण्डिंग

मंडप उभारून परीक्षा घेतल्याने केंद्र प्रमुख निलंबीत

बीड, दि. २३ : मंडप उभारून १० वीची परीक्षा घेणं बीडमधील केंद्रप्रमुखांना चांगलं भोवल आहे. शिक्षण विभागानं केंद्रप्रमुखांचं निलंबन केल आहे. कुर्ला या ठिकाणी यशवंत विद्यालयात जागे अभावी आणि अचानक विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण देत केंद्रप्रमुखानं थेट शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाईचे आदेश दिले. […]Read More

ऍग्रो

मुसळधार अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान

मुंबई, दि. 23 : दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील फेब्रुवारी महिन्यातील अवकाळा पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लातूरमध्ये विजेच्या कडकडाटासह गारपिटही झाली. बीडमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने 23 आणि 24 […]Read More

राजकीय

आरक्षणाचा मुद्दा निकालात निघेपर्यंत उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाही

नवी दिल्ली, दि. २३ : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीवर मनाई कायम ठेवली आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानुसार राज्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास […]Read More

देश विदेश

ऑपरेशन सिंदूर’ मधील कामगिरीसाठी सोलापूरच्या सुपुत्राचा विशेष सन्मान

नवी दिल्ली,दि. २१ : काश्मीरमध्ये पहलगाम येथे पाकिस्तानने पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले होते. या ऑपरेशन अंतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयातील ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुशील गायकवाडांना भारतीय लष्कर प्रमुखांचे […]Read More

ट्रेण्डिंग

जागतिक वारसा किल्ल्यांसाठी जतन-संवर्धन आराखडे तयार

मुंबई, दि. 21 : सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने निवडक जागतिक वारसा किल्ल्यांसाठी जतन-संवर्धन आणि पर्यटकांना सोयी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारसा सुरक्षित राहण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळणार आहे. राजगड, सांदेरी, साल्हेरछत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी मानला जाणारा राजगड किल्ला सध्या संवर्धनाच्या मोठ्या टप्प्यात आहे. येथे 4.91 […]Read More