चंद्रपूर दि २८:– चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध असणाऱ्या जखमी छोटा मटका म्हणजेच सीएम वाघालाअखेर जेरबंद करण्यात आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी भागातून छोटा मटकाला जेरबंद करण्यात आले, ब्रम्हा या वाघासोबत झालेल्या झुंजीत मे महिन्यात छोटा मटका गंभीर जखमी झाला होता तर ब्रम्हा वाघाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अलीकडेच गाईंच्या एका कळपावर हल्ला […]Read More
पुणे दि २८:– ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. निमित्त होते, […]Read More
वसई दि २८:– पालघर जिल्ह्यातल्या विरार मध्ये रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मंगळवारी रात्रीपासून महानगरपालिका आणि एन.डी.आर.एफ च्या 2 टीम यांच्या माध्यमातुन घटनास्थळी मलब्या खालून नागरिकांना शोधण्याचं कार्य सुरू होत. विरार मधल्या नारंगी इथल्या रमाबाई अपार्टमेंट या चार […]Read More
मुंबई दि २७– गणेश चतुर्थी निमित्त उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी झालेले राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज सकाळी (बुध. दि.२७) राजभवन येथील आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केली तसेच देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठापना व आरतीला राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. नाशिक कारागृहातील कैद्यांनी तयार […]Read More
गडचिरोली दि २७:– गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी नक्षल चकमक उडाली असून पोलीस व C-60 जवानांच्या धाडसी कारवाईत ४ जहाल माओवादी ठार झाले आहेत.यात १ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. घटनास्थळावरून SLR, INSASसह शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून चकमक जवळपास आठ तास चालली असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. २५ ऑगस्ट रोजी गडचिरोली […]Read More
पुणे दि २७ — पुण्यात आज गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मूर्ती अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीत दाखल झाली व सवितानंद महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. दुसरे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतींची […]Read More
जालना दि २७:– मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले. मुंबईला रवाना होण्यापूर्वी जरांगेंनी अंतरवाली सराटीत गणरायाची पूजा करत आरती केली. यावेळी गावातील महिलांनी औक्षण करून जरांगेंना त्यांच्या उपोषण आंदोलनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले असून सातव्यांदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या […]Read More
रत्नागिरी दि २७:– कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी गणपती आगमन होत आहे. अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाचे आगमन होते. पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात डोक्यावरून तसेच शेतातून पायी मूर्ती आणण्याची परंपरा आजही गावोगावी जपली जाते. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्ये पासून […]Read More
वसई दि २७– वसई तालुक्यातील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजय नगर यांच्या मधील असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या चार माळ्याच्या इमारतीचा मागील भाग इमारती खाली असलेल्या चाळीवर कोसळला असून त्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. दुर्घटना घडली आहे त्यामध्ये रहिवासी अडकले असल्याने त्यांचे बचाव कार्य वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफ 2 […]Read More
गडचिरोली दि २७:– गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात अडकला आहे. कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाबरोबरच छत्तीसगड राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पर्लकोटा, पामूलगौतम आणि इंद्रावती नद्या प्रचंड वेगाने वाहू लागल्या आहेत. यामुळे भामरागडचा जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पुलं पाण्याखाली गेले आहेत, रस्ते बंद झाले आहेत आणि लोक अक्षरशः कैदेत सापडले आहेत. या बिकट […]Read More