mmcnews mmcnews

महानगर

आंदोलन अटी शर्तींचे पालन करूनच, हुल्लडबाजी करणाऱ्यांना बाहेर काढा

मुंबई, दि. १ : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या मराठा आंदोलकांमुळे मुंबई शहरातील व्यवस्थांवर मोठा ताण येत आहे. त्यातच आत्ता गणेशोत्सव सुरु असल्याने मोठ्या जनसमुदायाच्या सुरक्षिततेच्या प्रश्नही निर्माण झाला आहे. सरकारने वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करुन देखील मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. रविवारी मनोज जरांगे यांनी आपण मरेपर्यंत उपोषण करणार […]Read More

देश विदेश

SCO परिषदेत पहलगाम हल्ल्याचा एकमुखाने निषेध

तिआंजिन, चीन, दि. १ : येथे पार पडलेल्या २०२५ च्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत भारताने दहशतवादाविरोधात मोठा राजनैतिक विजय मिळवला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सर्व सदस्य देशांनी एकमुखाने निषेध केला आणि दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची गरज व्यक्त केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे परिषदेत उपस्थित असताना हा […]Read More

राजकीय

‘वंदे मातरम’ गीत सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात

मुंबई दि १– थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ‘वंदे […]Read More

राजकीय

मराठा आरक्षणासाठी आता ग्रामस्तरावर छाननी समित्या

मुंबई, दि. १ : मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असतानाच सरकार पातळीवर बैठकींचा धडाका सुरू झाला आहे. आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. मराठवाड्यातील जनतेसाठी हैदराबाद गॅझेटबाबत साधारण मसुदा तयार असून अंतिम टप्यात आला आहे अशी माहिती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील […]Read More

महानगर

गणेशोत्सव विसर्जनासाठी महापालिका सज्ज

मुंबई, दि १बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे अनंत चतुर्दशी दिनी अर्थात शनिवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) याठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने विविध स्तरीय व्यवस्था करण्यात येते. याबाबत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना वृत्तसंकलन करणे अधिक सुविधाजनक व्हावे, याकरिता स्वतंत्र मंडप उभारण्यात येतो. या मंडपात प्रवेश करण्यासाठी प्रवेशपत्र बंधनकारक असते. वरीलनुसार आपल्या प्रसारमाध्यम संस्थेच्या प्रतिनिधींना प्रवेशपत्र हवे असल्यास, कृपया […]Read More

राजकीय

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि १गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांची आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य बाहेर मराठी बहुल असणाऱ्या प्रदेशात पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची […]Read More

महानगर

मराठा आंदोलन कर्त्यांसाठी उदगीर वरून आणल्या 1000 भाकऱ्या

मुंबई, दि 1गेल्या दोन-तीन दिवसापासून नांदेडमध्ये सुरू असलेला आंदोलनात पहिल्या दुसऱ्या दिवशी जेवणाचे आंदोलनकर्त्यांचे फार हाल झाले होते. ही बाब लक्षात घेऊन अनेक संस्था तसेच दानशूर व्यक्तिमत्व पुढे सरकावले असून आता आंदोलन करताना उदगीर येथून जेवणासाठी हजार भाकऱ्या आणि साजूक लोणी टेम्पो मध्ये भरून आणले असून ते आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना वितरित करण्यात आले. या […]Read More

पर्यटन

गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा !

मुंबई दि १– गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र सागरी मंडळ अशा दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर जेट्टी प्रकल्पाविरोधातील तिन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. या जेट्टी प्रकल्पाचा मार्ग यामुळे मोकळा झाला […]Read More

कोकण

कोकणात गौरी पूजनाचा उत्साह …

सिंधुदुर्ग दि १– काल गौराईच्या आगमनानंतर आज जिल्ह्यात सर्वत्र गौरीपूजनाचा उत्साह दिसून येत आहे . गौरीचे लाड पुरवण्यासाठी सुवासिनी सज्ज झाल्या आहेत. गौरीला सालंकृत नटवले जाते. दाग दागिने मढवले जातात. सुवासिक फुलांचा गजरा , वेणी माळली जाते. या सर्वांमध्ये महत्त्वाचं असते ते म्हणजे काकडीच्या फुलांचा हार. गौरीला सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून तो अवश्य गौरीच्या […]Read More

राजकीय

गरीब मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला पाहिजे ~ केंद्रीय

मुंबई , दि 1~ गरीब मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला पाहिजे.सातारा आणि हैदराबाद च्या गॅझेट चा शासनाने अभ्यास करून गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.गरीब मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळण्यासाठी राज्य […]Read More