mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेला GR

मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाबाबत गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आज यश मिळाले आहे. सरकारने याबाबतचा GR काढल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडत आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेला GR १. महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक आणि प्रादेशिक […]Read More

राजकीय

सरकारच्या शिष्टाईला यश, जरांगेंनी सोडले उपोषण, GR लागू

मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे यांचे उपोषण आज संध्याकाळी संपुष्टात आले. राज्य सरकारने त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मराठ्यांकडून विजयी जल्लोष केला जात आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटसंदर्भात जीआर काढला आहे. तर सातारा गॅझेसंदर्भातील जीआर काढण्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. हैदराबाद […]Read More

विदर्भ

आठवणीतील कवी सोपानदेव म्हशाखेत्री यांना राज्यस्तरीय कवी संमेलनातून अभिवादन..

गडचिरोली, दि २:डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) व गडचिरोली जिल्हा कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने “आठवणीतील सोपानदेव म्हशाखेत्री राज्यस्तरीय कवी संमेलन २०२५” चे आयोजन गडचिरोली काँम्पलेक्स येथील बी.ओ. आय -स्टार आरसेटीच्या सभागृहात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री […]Read More

विदर्भ

चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीला वेग : माजी खासदार डॉ. अशोकजी

गडचिरोली, दि २ :चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुरुड गावाजवळील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खडे व खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. अपघाताचा धोका लक्षात घेता चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांनी ही बाब माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने पुढाकार घेत […]Read More

गॅलरी

*हैदराबाद गॅझेटिअरवरील जीआरमुळे मराठा समाजाच्या न्यायप्राप्तीचा मार्ग सुकर :

मुंबई, दि २ :मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला शासन निर्णय (जीआर) आज राज्य सरकारने प्रसिद्ध केला असून, यामुळे मराठा समाजाच्या ऐतिहासिक न्यायाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले गेले आहे. या निर्णयाबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

“समतेचा वडापाव”: अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा प्रेरणादायी जिवंत देखावा

पुणे, दि २: अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 63 वे वर्षे साजरे करत आहे. सामाजिक समानतेचा आदर्श ठेवून कार्यरत आहे. मागील 20 वर्षापासून दरवर्षी मंडळ सामाजिक विषयावर भाष्य करणारे देखावे सादर करत आहे. अध्यक्ष नरेश राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाने या वर्षी एक अतिशय विशेष संदेशात्मक उपक्रम सादर केला. “मी आता प्रसाद रुपी समतेचा वडापाव”. हा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

दगडूशेठ गणपती समोर अथर्वशीर्ष पठण विक्रमाची ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस,

पिंपरी, दि २पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेश उत्सव काळात दरवर्षी ऋषिपंचमी दिवशी हजारो महिला भगिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतात. यावर्षी ३५ हजार २१५ महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हा एक जागतिक विक्रम आहे. याची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड मध्ये करण्यात आली. या वर्ल्ड […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

डॉ. संजय चोरडिया यांना ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार

पुणे, दि २ : आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने शिक्षणतज्ज्ञ, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांचा गौरव केला जाणार आहे.पुरस्कार वितरण समारंभ सोमवार, दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत […]Read More

महानगर

*भारतातील एकमेव आणि अद्वितीय गणेशोत्सव – ज्यात तुमच्यातील विवेक बुद्धि

मुंबई, दि २ : मुंबईच्या फोर्ट भागातील ‘अंतर योगच्या गुरुकुलात यंदाचा गणेशोत्सव देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचं कारण आहे या उत्सवाचं अद्वितीय स्वरूप — ज्यामध्ये केवळ पूजाअर्चा नव्हे, तर गणपती आणि अथर्वशीर्षावरील गहन ज्ञान, साधना आणि जीवनात परिवर्तन घडवणारी ‘गणेश विद्या’ शिकवली जाते. ३ सप्टेंबर २०२५ हा या दहा दिवसांच्या उत्सवातील गणेशभक्तांसाठी अत्यंत विशेष […]Read More

राजकीय

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता

मुंबई दि. ०२ — राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक -खाजगी भागिदारीतुन विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही ६० वर्षावरून ९८ वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन […]Read More