mmcnews mmcnews

कोकण

केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट?, रायगड अंधाराच्या खाईत…

महाड दि २८ : (मिलिंद माने)राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दीपोत्सवादरम्यान विज प्रवाह नसल्याने संपूर्ण रायगड किल्ला अंधाराच्या खाईत लोटला होता असे असताना रायगड किल्ल्यावरील मागील नऊ महिन्यापासून वीज बिल थकले असून केंद्र शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विज बिल थकले का ?असा सवाल या […]Read More

राजकीय

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन

मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग […]Read More

मराठवाडा

तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशा वर..

मुंबई दि २८ : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर – तुळजापूर – धाराशिव या ३२९५ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.अर्थात, याचा फायदा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील आई तुळजाभवानीच्या भावीक- प्रवाशांना होणार आहे अशी माहिती धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप […]Read More

राजकीय

लोककलावंताच्या प्रमाणितीकरण, संहितीकरणासाठी स्वतंत्र समिती

मुंबई, दि. २८ :राज्यातील लोककलावंताच्या जतन,संवर्धन व प्रमाणितीकरण, संहितीकरणासाठी स्वतंत्र समिती सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत स्थापन करु, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज दिली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोककलावंतासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे याबाबत बैठक झाली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्यासह लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. […]Read More

राजकीय

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच !, एम-सँड धोरणात मोठी सुधारणा

मुंबई, दि. २८ : राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा (एम सँड) वापर वाढवा तसेच दर्जाहीन कृत्रिम वाळूवर थेट कारवाई व्हावी यासाठी मूळ धोरणात सुधारणा करण्यात आली असून, एम सँड युनिटला मान्यता तसेच यापद्धतीच्या युनिटला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय मर्यादा ५० वरून १०० युनिटपर्यंत नेण्याचा मंत्रालयपातळीवरील हक्क जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एम सँड युनिटसाठी दिलेल्या […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त)

मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर, २०२५(नियोजन विभाग)विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित विश्लेषण करून डॉक्युमेंट तयार. राज्य व जिल्हा पातळीवरील १६ संकल्पना निश्चित. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या अंतर्गत १०० उपक्रम […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

हिंदू राष्ट्र होण्यासाठी समर्पण भावनेने योगदान द्या – महंत श्री

पुणे, दि २८छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने, विश्वाला शांती आणि संयमाचा मार्ग दाखवणारे ज्ञानेश्वर माऊली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर सर्वांनी संकल्प करावा की, सर्वांना सामावून घेणारा एकमेव धर्म म्हणजे सनातन धर्म आहे. याची पताका जगात उंचावण्यासाठी आणि भारत देश हिंदू राष्ट्र […]Read More

सांस्कृतिक

वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे दुःखद निधन..

मुंबई दि २८ :- मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे, प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती. दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]Read More

पर्यावरण

IMD चा हाय अलर्ट- महाराष्ट्रावर घोंगावतय ‘Montha’ चक्रीवादळ

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन झालं असून आता महाराष्ट्रावर एक मोठं संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून […]Read More

राजकीय

इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः घरात बसलेले ‘अजगर’

मुंबई दि २७ : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली. इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर […]Read More