नवी दिल्ली, दि. 11 : बिहार विधानसभेच्या 242 जागांसाठी आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 67.14 टक्के मतदान झाले. बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे आणि आता सर्वांनाच निकालाचे वेध लागले आहेत. एक्झिट पोलमध्ये निकालाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. बिहारमध्ये […]Read More
मुंबई, दि. ११ : अनेक वर्षांपासून रखडलेला विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 126 किमी लांबीच्या या रस्त्याच्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. अलिबाग विरार हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर विरार ते अलिबाग दरम्यानचा प्रवासाचा वेळ 4 तासांवरून अंदाजे 90 मिनिटांपर्यंत कमी होईल. MSRDC ने […]Read More
मुंबई, दि. ११ : भारतात मुदत ठेवी (Fixed Deposit – FD) हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदराने स्थिर परतावा मिळतो, त्यामुळे जोखीम न घेता हमखास उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना आदर्श ठरते. बँका, पोस्ट ऑफिस, लघु वित्त बँका (SFB) आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) यांच्याकडून एफडी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. […]Read More
मुंबई,दि. ११ : भारताच्या क्रिप्टो बाजारपेठेत मोठा बदल घडला आहे. Gen Z म्हणजेच १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी प्रथमच मिलेनियल्सना मागे टाकून क्रिप्टो गुंतवणुकीत आघाडी घेतली आहे. CoinSwitch च्या Q3 2025 अहवालानुसार, या वयोगटातील गुंतवणूकदारांचा हिस्सा ३७.६% इतका आहे, तर मिलेनियल्स (२६–३५ वर्षे) यांचा हिस्सा ३७.३% आहे. यामुळे भारतातील डिजिटल गुंतवणुकीचे चित्र अधिक तरुण झाले […]Read More
मुंबई, दि. ११ : मुंबईतील विविध शासकीय कार्यालयांनी मुंबई महापालिकेचा तब्बल १८०० कोटी ३३ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला असून त्यामुळे महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. कर भरण्याकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधार मालमत्ता कर राहिला आहे. मात्र अनेक शासकीय संस्था हा […]Read More
नवी दिल्ली, दि. 11 : काल संध्याकाळी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना अपघात नसून आत्मघाती हल्ला असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर तपासाची सूत्रे राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आली […]Read More
मुंबई, दि. ११ : ‘एआय’ म्हणजे केवळ संगणकाचा वापर नव्हे, तर मानवी मेंदूच्या विचारसरणीचे तंत्रज्ञानरूप आहे. ‘एआय’ चा वापर कौशल्यपूर्ण केला तर अधिक सुलभपणे काम करता येऊ शकते, असे मत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी व्यक्त केले.मंत्रालय येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात वृत्तपत्र, […]Read More
मुंबई दि ११ : राज्यातील न्यायालयांचा परिसर तसेच न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षक नियुक्तीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (एमएसएससी) उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. राज्यातील न्यायालयांतील सुरक्षा व्यवस्थेबाबत उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ – छत्रपती […]Read More
मुंबई दि ११ : नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी, नागपूर जिल्हा बँकेला८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि […]Read More
मुंबई, दि ११शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने माझगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना उपनेते यशवंत जाधव आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. काही लोक आपण केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर नजर ठेवावी आणि वेळेत त्यांना प्रत्युत्तर देऊन […]Read More