मुंबई, दि ११मुंबईत दाट लोक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये विशेषतः मानखुर्द गोवंडीमध्ये नवजात बालकांची विक्री करणारे टोळ्या कार्यरत असून या टोळ्या या सरकारी रुग्णालयामधील नवजात शिशूंची विक्री करतात. तसेच या टोळ्यांना नवजात शिशु ची माहिती तेथीलच रुग्णालयातील कर्मचारी देतात. अशा गैरप्रवृत्त कृत्य करणाऱ्या टोळ्यावरती सरकार कारवाई करणार का असा प्रश्न आमदार म्हणून नार्वेकर यांनी विधान परिषदेमध्ये […]Read More
मुंबई, दि ११ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी तर ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर, एकूण २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. दरम्यान, जप्तीची कारवाई सुरू होताच एकूण २ हजार […]Read More
मुंबई, दि ११: सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स(सीआयटीयू) महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने फेरीवाल्यांच्या न्याय्य हक्कसाठी आणि फेरीवाला कायदा अंमलात आणावा तसेच त्यांच्यावर होत असलेली अन्याय्य त्वरित थांबवावी या मागणीकरिता आज राज्यात सर्व जिल्ह्यात आंदोलन, धरणे निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आज आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील फेरीवाले यांच्यावर कारवाई झाल्यामुळे संतप्त झालेले […]Read More
मुंबई, दि ११ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मुंबईतील वांद्रे येथे थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला अनेक सिनेमाचे कलाकार तसेच तंत्र मंडळी हजर होती. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट वर तसेच मुंबईत आलेल्या आरडीएक्सवर आधारीत हा […]Read More
मुंबई दि ११ : राज्यासमोर अनेक अडचणी आहेत मात्र त्यातून मार्ग काढण्याची क्षमता आपल्या राज्याची असल्यामुळेच देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असणारे राज्य आपलेच असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. गेले दोन दिवस विधानसभेत झालेल्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यावरील कर्ज वाढते आहे याची चिंता करण्यापेक्षा ते कुठे […]Read More
मुंबई, दि ११: वर्षा या शासकीय निवासस्थानी ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण व मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या […]Read More
मुंबई, दि ११आवाज ही मानवाला दिलेली देणगी आहे. आवाज आणि ध्वनी यातील फरक संगीत शिक्षकांना ओळखता आला पाहिजे. संगीत शिकविताना तसेच अर्थपूर्ण संवाद साधताना आवाजातील चढ उतारांमधील समतोल साधणेही तितकेच गरजेचे आहे. आवाजातील सकारात्मकता ओळखता आली की, संभाषण हृदयापर्यंत सहज भिडते, अशा शब्दात प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी संवादाचे महत्त्व पटवून दिले. […]Read More
मुंबई, दि ११मुंबईतील उद्यानांमध्ये बांबू लागवड करण्याबाबतची सखोल माहिती देण्यासाठी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष श्री. पाशा पटेल यांच्यासह बांबू लागवड क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात गुरुवारी (दिनांक १२ मार्च २०२६) ‘बांबू लागवड, विविध योजना व महत्त्व’ या विषयावर […]Read More
मुंबई, दि ११गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ – ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्र (TBM) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया आज (दिनांक ११ मार्च २०२६) औपचारिकरीत्या सुरू करण्यात आली. नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत तब्बल तीन महिने अगोदर ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने […]Read More
मुंबई, दि १०हजारो गिरणी कामगार आणि वारसांनी आझाद मैदानावरील महाआंदोलनात मोठ्या संख्येने सामील होऊन संताप व्यक्त केला! आजचा मोर्चा अभूतपूर्व ठरला!आझाद मैदानावरील कामगारांच्या आंदोलनात लढा समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी सांगितले जो पर्यंत रखडलेल्या घरांचा हक्क मार्गी लागत नाही,तो पर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही.विधानसभा आणि मैदानामध्ये हा लढा नेटाने लढविला जाईल.ज्या गिरणी कामगारांनी स्वातंत्र्यलढ्यात […]Read More