Month: March 2026

महानगर

राष्ट्रीय चर्मकार संघाचा धारावीत होणार रौप्य महोत्सवी सोहळा

मुंबई, दि १२राष्ट्रीय चर्मकार संघाचा रौप्य महोत्सवी सोहळा शनिवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता धारावीमधील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी गुरु रविदास महाराज,संत कक्कया महाराज, […]Read More

सांस्कृतिक

श्रेष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली, “सोळावं वरीस धोक्याचं”

मुंबई दि. १२ मार्च – : महाराष्ट्राच्या लावणी परंपरेला नवे आयाम देणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “सोळावं वरीस धोक्याचं – अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी रात्रौ ८:३० वाजता मास्टर दीनानाथ […]Read More

राजकीय

एस.टी.च्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास

मुंबई दि ११ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ताब्यातील अतिरिक्त व मोकळ्या जागांचा अधिक परिणामकारक वापर करून महसूल वाढविणे, प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती साध्य करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या विषयावर महाराष्ट्र विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेची […]Read More

देश विदेश

भारतातील बंदर व गोदी कामगारांसाठी दिल्लीत बोनस करार संपन्न

दिल्ली, दि १२:अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगारांना २०२० – २१ ते २०२५ – २६ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू होणारा बोनस करार ( पी एल आर – उत्पादकतेशी सांगड घालणारी बक्षीस योजना ) ११ मार्च २०२६ रोजी औद्योगिक कलह कायदा १९४७ कलम १२ (३ ) नुसार केंद्रीय श्रम आयुक्त यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत संपन्न […]Read More

राजकीय

आढावा घेण्यासाठी दर महिन्याला बैठक घेणार, महापौर श्रीमती रितू तावडे

मुंबई, दि १२जन्म नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे, हा फक्त शासकीय दस्तावेज देण्यापुरता मर्यादित विषय नसून त्याचाच संबंध थेट राष्ट्रीय सुरक्षेशी आहे. जेव्हा कार्यवाहीतील चुका शोधून लोकप्रतिनिधी स्वतःहून आपल्याकडे सर्व माहिती आणून देतात तेव्हा त्यावर आवश्यक ती सर्व कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा प्रशासनाने उभी केली पाहिजे. जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र विषयक […]Read More

महानगर

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी मोर्चा

मुंबई, दि १२जनतेच्या विविध मागण्यांच्या सोडवणूकीसाठी आझाद मैदान मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चात रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा) वतीने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्याच्या अर्थसंकल्पातील १५ निधी अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात यावा असा शासन निर्णय दि २१ जून १९७९ रोजी राज्य सरकारने काढला होता त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती जमाती चा निधी […]Read More

राजकीय

बिबट्यांना शेड्युल दोन मध्ये आणण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई दि ११ : राज्यातील बिबट्यांचा वाढता वावर आणि माणसावरील हल्ले पाहता बिबट्यांना शेड्युल एक मधून शेड्युल दोन मध्ये आणण्याच्या प्रस्तावाला कालच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सत्यजित देशमुख यांनी उपस्थित केली होती त्यावर गोपीचंद पडळकर, समीर कुणावर, प्रकाश सुर्वे आदींनी उपप्रश्न विचारले . केंद्रीय […]Read More

राजकीय

मुंबईतील दुमजली झोपड्यांना पुनर्विकास योजनेत मान्यता नाही

मुंबई दि ११ : मुंबई शहरात असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी केवळ जमिनीवर असलेल्या झोपड्यानाच प्रचलित कायद्यानुसार ग्राह्य धरण्यात येईल , झोपड्यांच्या पोटमाळ्यावरील लोकांना नाही असं स्पष्ट उत्तर प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. याबाबतचा मूळ प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता त्यावर वरुण सरदेसाई, अस्लम शेख, मुरजी पटेल, दिलीप लांडे यांनी उपप्रश्न विचारले. पोटमाळ्यावरील […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

पुणे, दि १२आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात, […]Read More

महानगर

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मोठा दिलासा

ठाणे, दि ११– ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी मालमत्ता करावरील शास्ती म्हणजेच दंड आणि व्याजामध्ये तब्बल 90 टक्के सूट देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती ठाणेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गटनेते पवन कदम तसेच महापालिकेचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते. […]Read More