Month: July 2023

महानगर

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी […]Read More

कोकण

कुंडलिका तुडुंब भरून वाहू लागली, शाळा बंद

अलिबाग, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड आणि रोह्यासह सर्व तालुक्यात मुसळधार पाऊस असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत, कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे, त्यामुळे जुना पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा नगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, रोहा इथे अष्टमी पुलावर पोलीस तैनात असून शाळा कॉलेजेस ना सुट्टी […]Read More

विदर्भ

पावसाने पिके गेली पाण्याखाली…

बुलडाणा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभराच्या विश्रांती नंतर बुलडाणा जिल्ह्यात रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.. जिल्हाभर हा पाऊस पडत आहे, सकाळी काही वेळ पाऊस थांबला होता मात्र आता परत पाऊस सुरू झाला आहे. तर रात्रभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खामगाव,संग्रामपूर, जळगाव जामोद या तालुक्यात नुकतीच उगवलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.. तर काही ठिकाणची शेती […]Read More

अर्थ

देशाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशां’कात महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीति आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-2022’ अहवालात 78.20 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.तर तामिळनाडू राज्याने पहिले स्थान मिळवले आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, नीति आयोगाचे उपाध्‍यक्ष सुमन बेरी यांनी ‘निर्यात सज्जता निर्देशांक (Export Preparedness Index ) 2022’ […]Read More

विदर्भ

वाशीम जिल्ह्यात धो धो!, नदी नाल्यांना पूर

वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मागील १४ तासांपासून सततधार पाऊस सुरू असल्यामुळे अडान नदीला पूर आला आहे. या मुसळधार पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यात पूर परिस्थितीमुळे पिंपरी खरबी गावचा संपर्क तुटला असून असाच मुसळधार पाऊस चालू राहिल्यास अडाण नदीचे […]Read More

ऍग्रो

बोगस बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमती, विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शेतकऱ्यांची बोगस बियाणे आणि खते यात फसवणूक होऊ नये यासाठी १९६६ सालापासून अस्तित्वात असलेला जुना कायदा बदलून याच आठवड्यात नवीन कायदा आणतोय असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं , याशिवाय गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी दिली, मात्र […]Read More

राजकीय

बार्टी प्रकरणी विरोधकांनी केला सभात्याग

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील बार्टी संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याकामी राज्यभरात १६ जिल्ह्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड न केल्याने सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याच्या प्रश्नावर सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत तो राखून ठेवण्याची मागणी केली मात्र अध्यक्षांनी ती नाकारली , त्यामुळे विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. या विद्यार्थ्यांची […]Read More

महानगर

राज्यपालांनी घेतली कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषि हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषि विकासात कृषि विद्यापीठांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील कृषि विद्यापीठांच्या विविध समस्यांचे निराकरण प्राधान्याने करून विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे दिल्या. राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील कृषि विद्यापीठांच्या […]Read More

गॅलरी

एकनाथ शिंदे यांनी केले मोदींचे स्वागत

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील हॉटेल अशोका येथे पोहोचले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित आहेत. ML/KA/SL 18 July 2023Read More

राजकीय

बार्टी प्रकरणी विरोधकांनी केला सभात्याग

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्यातील बार्टी संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याकामी राज्यभरात १६ जिल्ह्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड न केल्याने सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याच्या प्रश्नावर सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत तो राखून ठेवण्याची मागणी केली मात्र अध्यक्षांनी ती नाकारली , त्यामुळे विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. या विद्यार्थ्यांची स्पर्धा […]Read More